शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

एकदऱ्याचे पाणी कोणाच्या पदरात पडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:48 IST

पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.

ठळक मुद्देगोदावरी की गिरणा मोसम पाण्यावरून भविष्यात श्रेयवादाची रंगणार लढत

रामदास शिंदे।पेठ : एकदरे वळण बंधाºयाची जागा निश्चित झाल्यानंतर व स्थानिकांना कोणताही अपाय न होता धरणग्रस्तांना योग्य न्याय व मोबदला देण्याच्या सरकारी आश्वासनानंतर हा प्रकल्प उभा राहिल्यास याचे लिफ्ट होणारे पाणी नेमके कोणाच्या पदरी पडणार यावरून भविष्यात जल रणकंदन माजण्याची शक्यता निर्माण होणार असून, यामध्ये लोकप्रतिनिधींचा मात्र राजकीय कस लागणार आहे.नाशिक जिल्ह्याचे क्षेत्र साधारणपणे गोदावरी व गिरणा अशा दोन प्रमुख खोºयांमध्ये विभागले गेले आहे. पेठ, सुरगाणा या दोन तालुक्यात आजही बºयापैकी सरासरीनजीक जाणारा पाऊस पडत असतो; याच तालुक्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या चांदवड, मालेगाव, नांदगाव तालुक्यात मात्र दुष्काळाचे सावट दिसून येत असते. त्यामुळे मांजरपाडापासून एकदºयापर्यंतच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून सदरचे पाणी दिंडोरी व कळवण तालुक्यातील वळण बंधाºयात टाकल्यास नाशिक जिल्ह्यातीत सर्वच दुष्काळी तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार असून, वर्षांनुवर्ष दुष्काळाच्या छायेत अडकून पडलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. यासाठी दुष्काळी तालुक्यातील जनतेने जागे होणे गरजेचे आहे.पाण्यासाठी संघर्षाची भूमिका ठेवून शासनाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झालीआहे. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आंबेगणनजीक झारलीपाड्याच्या वळण बंधाºयाद्वारे वाघाड धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून वाघाड, पालखेडमार्गे येवला, चांदवड, नांदगाव, मालेगावसारख्या तालुक्यांना सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होऊ शकते. दुसरीकडे हेच पाणी गोदावरी खोºयात वळवून कश्यपी, गंगापूर धरणातूनसिन्नरमार्गे थेट जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.एकंदरीत एकदरे वळण प्रकल्पावर आगामी काळात स्थानिक जनतेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघर्ष समिती यांना आपापल्या स्तरावर काम करण्याची गरज आहे. ( समाप्त )खासदारद्वयींची भूमिका महत्त्वाचीनाशिक जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून, नाशिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे हेमंत गोडसे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण करीत आहेत. एकदरे वळण बंधाºयाचे पाणी आपापल्या मतदारसंघात वळविण्यासाठी दोन्ही खासदारांचे प्रयत्न सुरू राहणार असून, यामध्ये कोण बाजी मारेल याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिमवाहिनी प्रकल्प चर्चेला येणार आहेत. मागील आठवड्यात केंद्रीय जल आयोगाच्या पाहणी पथकाने पेठ तालुक्यातील एकदरे प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाची निर्मिती झाल्यास सदरचे पाणी वाघाड धरणात वळविण्यासाठी आग्रह धरला आहे.