शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मखमलाबादच्या एका कोपऱ्यात कोणाला विकास हवाय?

By संजय पाठक | Published: February 10, 2019 12:17 AM

ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीचा तुकडा असेल किंवा ज्या जमिनीवर गुंठेवारीचे व्यवहार झाले आहेत, त्याविषयी काय हे आज स्पष्ट केले जात नाही.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या अपारदर्शी कारभाराने गोेंधळव्यवसायिक- राजकिय नेते असलेले शेतकरी सर्वात पुढेविश्वासात न घेताच प्रकल्पाची आखणी

संजय पाठक/ नाशिक - कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव हा लोकानुकूल हवा असेल तर त्यासाठी आधी लोकांना विश्वासात घेणे महत्वाचे असते आणि ते शक्य नसेल तर काय होते त्याचे स्वच्छ उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटीचा मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड प्रकल्प होय. संबंधीत नागरीकांना त्याचे आकलन होण्याच्या आत ज्या घाईगर्दीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ते बघता शेतकºयांना प्रशासनाची घाई संशयास्पद वाटणे अगदी स्वाभाविक आहे. मग अशावेळी प्रस्तावाला विरोध होऊन तो रखडणार नाही तर काय होणार?

नाशिक महापालिकेने शहर स्मार्ट करण्यासाठी उसने अवसान म्हणून स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केली आणि आहे ती स्वायत्तता हरवून मनस्ताप ओढावून घेतला आहे. रखडलेली कामे हा कंपनीच्या कामकाजाचा एक अविभाज्य भाग बनला आहे सहाजिकच आधी कालीदास कालीदास कला मंदिर, मग नेहेरू उद्यान त्यानंतर विद्युत शवदाहीनी आणि आता मखमलाबाद येथील प्रकल्पाचे रखडणे हे स्वाभाविक झाले आहे. शहराच्या एका कोप-यात एका वर्गाला विशेष वागणूक देण्यासाठी मुळातच अशाप्रकारचा विषमता निर्माण करणारी स्मार्ट नगरी स्थापन करणे म्हणजे उर्वरीत भागातील नागरीकांवर एकतर अन्याय करण्यासारखे किंवा मग ज्यांच्याकडे मुलभूत सुविधाच नाही त्यांच्याजखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. परंतु जे अनेक लोकप्रतिनिधी आज मखमलाबाद येथील अशा प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ते सभागृहात असताना २०१५ मध्येच स्मार्ट सिटीचा आराखडा तयार झाला आणि तोच शासनाने मंजुर केला आहे. परंतु आता राजकिय लाभासाठी शेतक-यांचे कैवारी बनून सर्व संबंधीत फिरत आहेत.

मखमलाबाद येथील साडे सातशे एकर शेती क्षेत्र एकत्र करून त्याठिकाणी नगररचना योजना राबविण्यात येईल आणि त्यानंतर फायनल प्लॉट शेतक-यांना दिले की, मग जागेचे भाव वाढणार वगैरे असे सांगितले जात आहे. ग्रीन फिल्ड किंवा हरीत क्षेत्र असे त्यासाठी नाव देण्यात आले आहे. मात्र मुळातच दिसते तेवढे सोपे आणि लाभदायी असे हे प्रकरण नाही. जमिन व्यवहारांची तांत्रिकता वाढवणारा हा प्रकार असून त्यामुळे सामान्यांच्या डोक्याबाहेर आहे. नक्की आपल्या जमिनीचे काय होणार हे अनेकांना माहितीच नाही. परंतु दोन चार हुशाार कथीत शेतकरी कम राजकिय नेते सांगतील त्यांच्यामुळे आधीच संभ्रम त्यात प्रशासनाचे एकेक उपाय यामुळे सामान्य नागरीक आधीच बुचकळ्यात पडले आहेत. त्यातच स्मार्ट सिटीच्या अपारदर्शक कार्यपध्दतीने प्रकल्पासाठी आधी शेतक-यांशी संंवाद साधून त्यांना राजी करणे त्यांना लाभाचे गणित मांडून सर्वाेक्षणासाठी अनुकूलता मिळवणे हे सर्व कामे उलट्या क्रमवारीने होत आहेत. त्यावर आता दिलासा देण्यासाठी स्मार्ट सिटीचे संचालक आणि महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन फॉर्मुले मांडले आहेत. त्यात शेतक-यांकडे किती जमीन असेल तर त्याला काय द्यावे लागेल आणि कंपनी काय देणार अशाप्रकारचे लाभाचे गणित मांडले आहेत.

ज्यांचा जमिन हा व्यवसाय आहे, किंवा ज्यांच्या जमिनींवर मुलत: आरक्षण आहे. अथवा ज्यांच्या जमिनी गोदावरी नदीकाठी आखण्यात आलेल्या पुररेषेमुळे डेड इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांना हे सुखावणारे चित्र असले तरी त्यांचे अंतर्गत स्वरूप क्लिष्ट आहे. अर्धा एकर जमिनीचा तुकडा असेल किंवा ज्या जमिनीवर गुंठेवारीचे व्यवहार झाले आहेत, त्याविषयी काय हे आज स्पष्ट केले जात नाही. शेतजमिनी म्हंटले की अनेक प्रकारचे न्यायालयीन वाद आणि कोर्ट कज्जे असतात. अशा जमिनींचे काय हे देखील सांगितले जात नाही अडचणी न मांडता केवळ सुखावह जे आहे तेच सांगितले जात असल्याने खरे शेतकरी अधिक अडचणीत आहेत. त्यामुळेच प्रकल्प रखडण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी