शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

राष्ट्रवादीत कोण नाराज ?

By किरण अग्रवाल | Published: September 23, 2018 1:37 AM

अगोदर कार्यकर्ता बनून नंतर नेतेपदावर जाण्याचे दिवस संपलेत, आता राजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी असतात; थांबायला कुणी तयार नसतो. दुसरे म्हणजे, आपली उपयोगीता संपली हे जाणून न घेता अनेकजणांचा पदांवर बनून राहण्याचा किंवा निवृत्ती काळातही ते मिळविण्याचा सोस कायम असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित झाल्यावर नाराजीची भावना पुढे आली ती त्यातूनच.

ठळक मुद्देराजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले,जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी झाली, तेव्हा त्यात घेतल्या गेलेल्या नाशिकच्या नावांबाबतही नाराजीची चर्चा झडून गेली होतीच. ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले, हा त्या नाराजीमागील प्रश्न होता. आता जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रवक्ते नेमले गेल्यावर संधी डावलले गेलेले नाराज झाले आहेत म्हणे. वस्तुत: जिल्ह्याचे संघटनात्मकदृष्ट्या विभाजन करून लोकसभा मतदारसंघनिहाय दोन जिल्हाध्यक्ष व त्यांना सहकार्याला कार्याध्यक्ष असा ‘फॉर्म्युला’ यंदा वापरला गेला. त्यामुळे एकापेक्षा अधिकांना संधी मिळून गेली. यातून आजवरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पंख कापल्याचा अर्थ काढला जाणे स्वाभाविक असले तरी, पक्षाने सामाजिक समतोल साधण्याची चतुराई यात दाखविली. शिवाय, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सल्ला त्यासाठी घेतला गेला. असे असताना नाराजी व्यक्त केली जात असेल तर काय गावोगावी व गल्लोगल्ली जिल्हाध्यक्ष नेमायचेत का, असाच प्रश्न उपस्थित व्हावा. बरे, तसे करायचे झाल्यास त्यासाठीही सक्षम माणसे हवीत. आहेत का ती तेवढी? प्रदेश सहकोषाध्यक्ष व सहकार सेलचे राज्याचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना खाली उतरवत जिल्हा प्रवक्तेपदी व प्रदेश प्रवक्ते व राज्य उपाध्यक्ष असलेल्या डॉ. भारती पवार यांनाच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अतिरिक्त जबाबदा-या देण्यात आल्याचे पाहता अशी जर ‘वानवा’ असेल तर मग नाराज होणारी मंडळी कोण व काय क्षमतेची याचा विचारच न केलेला बरा. दुर्दैव असे की, नवोदितांनी गुडघ्याला बाशिंग बांधून असणे एकवेळ ठीक; पण सर्वकाही भूषवून व मिळवून झालेले जुनेही आपली ‘जीर्णता’ न सोडता पदांमध्ये मन अडकवून ठेवणार असतील तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस