लहरी निसर्ग द्राक्षाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:00 IST2020-09-12T00:59:49+5:302020-09-12T01:00:20+5:30
ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि. १०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.

लहरी निसर्ग द्राक्षाच्या मुळावर
ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि. १०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला.
द्राक्ष उत्पादक बागायतदारांच्या नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बहुतांश भागात छाटण्या सुरू होऊन जातात. त्यात बागलाण पट्ट्यात अर्ली छाटणीमुळे तेथील शेतकऱ्यांनी आॅगस्ट महिन्यांपासून ज्या छाटण्या केल्या होत्या त्यातील बरीच द्राक्षबाग ही सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पडणाºया पावसाने तेथील बागांमध्ये डावणीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर डोके वर काढत आहे तर निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक व सिन्नरच्या काही भागांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पावसाळा हा लांबल्याने व सुरुवातीच्या काळात अपेक्षित पाऊस न पडल्याने या भागातील बागायतदारांमध्येदेखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे बागलाण पट्ट्यातील नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी द्राक्ष निर्यात यंदा पुढे जाऊ शकते.
एकूणच या सर्व उपाययोजना बघता पाऊस आणखी किती दिवस पडतो त्यावर उत्पादन अवलंबून राहील. त्यामुळे मागील वर्षी मोठी आर्थिक झळ बसलेल्या शेतकºयांना यंदा ती भरून निघते की नाही अशी शंका आहे.