वडाळा परिसरातील गोठे केव्हा हटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:27+5:302021-02-05T05:41:27+5:30

इंदिरानगर - शहरातील सर्वात जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षापासून ...

When will the herds in Wadala area be removed? | वडाळा परिसरातील गोठे केव्हा हटणार?

वडाळा परिसरातील गोठे केव्हा हटणार?

इंदिरानगर - शहरातील सर्वात जास्त वडाळा गाव परिसरात जनावरांचे गोठे आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तीस वर्षापासून गंभीर बनत चालला आहे. एक वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यात जनावरांचे गोठे स्थलांतर करण्याच्या आदेश देण्यात आला होता. परंतु तेव्हाही नोटीस वाटप करण्याचा सोपस्कार करण्यात आला होता. जनावरांचे गोठे हलविण्यास तेव्हाही मुहूर्त लागला नाही. आताही स्थायी समितीत या विषयावर चर्चा झाली आणि सभापतींनी आदेशही दिले मात्र गोठे खरोखरच हटतील काय या विषयावर शंका आहे.

जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे वडाळा गाव रस्ता व वडाळा गावातील लोकवस्तीत जनावरांची गोठे हाेते. महापालिकेच्या कारवाईच्या इशाऱ्यावर काही प्रमाणात गोठे हटवण्यात आले, मात्र बहुतांश गोठे जैसे थे आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला माणसापेक्षा जनावरे महत्त्वाचे असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे महापालिकेच्या वतीने गोठेधारकांना फक्त नोटिसा बजावून फक्त सोपस्कार केला जातो

वडाळागावात जिनत नगर ,मेहबूबनगर, अण्णाभाऊ साठे नगर , मुमताज नगर ,गुलशन नगर,यासह रहिवासी परिसर असून सुमारे बारा हजार लोकवस्ती असलेले वडाळा गाव आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी एक ते दोन जनावरांचे गोठे होते आता त्यांची संख्या चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत आहे. जनावरांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने बहुतेक गोठेधारकांना सर्रासपणे जनावर मलमूत्र गोठ्याबाहेर खड्डा करून किंवा बाहेर सोडून दिले आहे त्यामुळे पिंगुळ बाग परिसरातील काही नागरिकांच्या घरात मलमूत्र शिरत आहे तसेच मलमूत्र नाल्यांमध्ये सोडून दिल्याने सदर नाला विविध कॉलनी आणि सोसायट्यामधून जात असल्याने घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. तसेच सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणी जाऊन मलमूत्र दुतर्फा रस्त्यावर वाहत असते. अनेक वेळेस समक्ष भेटून आणि निवेदन देऊन सुद्धा अद्यापी जनावरांचे गोठे हटवली जातानाही नाही.

इन्फो..

आयुक्तांचे दौरे की रोड शो?

सुमारे दोन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त यांनी वडाळा गावातील जनावरांच्या गोठ्याचे मलमूत्रामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या भागाची पाहणी केली हेाती. त्यानंतर अद्यापी परिस्थिती जैसे थेच असल्याने दौरे फक्त रोड शाे ठरत आहे.

इन्फो..

राजकीय विरोध

नाशिक शहरातील बहुतांश ठिकाणी गोठ्यांचा प्रश्न गंभीर आहे. परंतु काही राजकीय नेत्यांचे गोठे असल्याने दरवेळी याबाबत केवळ घोषणाच होते आणि गोठे हटवण्याचा विषय मागे पडतो. त्यामुळे आता तरी कार्यवाही होईल की नाही, याबाबत सांशकता आहे.

Web Title: When will the herds in Wadala area be removed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.