शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:53 IST

सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे.

ठळक मुद्देकांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलोतासाभरातच १०० किलो कांदा विक्रीसेलिब्रिटींनाही भुरळ

 नाशिक : काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी कांदा घेण्यासाठी याठिकाणी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.       रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे कुतकोटी सभागृहाच्या पार्किंगमध्ये काही दिवसांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसºया व चौथ्या रविवारी ‘सेंद्रिय भाजीपाला’ उपलब्ध होत असतो. याठिकाणी जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी आपला सेंद्रिय शेतीमाल याठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये भाव मिळत असल्याने शहरातील किरकोळ बाजारात कांद्याला ७० ते ८० रुपये भाव मिळत असतांना सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो दराने मिळत असल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे रविवारी (दि.१०) फक्त १ तासातच १०० किलो कांदा विक्री झाला. येवल्यातील सदाशिव शेळके या शेतकऱ्यांने या बाजारात कांद्यासह, टमाटे, बटाटे, काकडी, वांगे, भोपळा, शिमला मिरचीसह इतर भाज्यांही विक्रीसाठी आणल्या होत्या. कांद्याप्रमाणे इतर भाज्यांचे दरही ३० रुपये प्रतिकिलो प्रमाणेच असल्याने सर्वच भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या बाजारात कांद्यासोबत इतर भाजीपाला, फळभाज्या देखील उपलब्ध असून इतर बाजारभावापेक्षा त्यांचाही भाव अंत्यत कमी दिसून येत आहे. त्यात हा भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर झाल्याने ग्राहकांची याला चांगली पसंती मिळत आहे.सेलिब्रिटींनाही भुरळशेळके हे गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे उत्पन्न घेत असून गेल्या ११ वर्षांपासून ते दर रविवारी मुंबईतील बांद्रा येथे त्यांचा सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी नेत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी त्यांच्या कडून आमिर खान यांच्या पत्नी किरण राव, काजोलसह इतरही काही मोठ्या सेलिब्रिटी रांगेत उभे राहुन न चुकता भाजीपाला खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.आजवर शेती करत असतांना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करत केवळ सेंद्रिय खतांवर शेतीची उत्पादने घेत आलो आहे. शेतीसाठी नेहमीच शेणखताचा वापर करत आहे. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असून ही उत्पादने खाण्यासाठी चांगले आहे. त्यात मार्केटमध्ये कितीही बाजारभावात कितीही चढउतार झाला तरी आमच्याकडे भाव हा स्थिरच ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सदाशिव शेळके, भाजीविक्रेतेअवकाळी पावसामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडल्यामुळे इतर बाजारात भाजीपाला खरेदी करतांना विचार करावा लागतो. मात्र याठिकाणी आल्यानंतर येथील भाज्यांचे दर बघुन मी आश्चर्यचकित झाले. कांदा फ क्त ३० रुपये किलोने मिळत असल्याचे बघून लगेच खरेदी केला. तसेच इतर भाजीही बाहेरील बाजारापेक्षा स्वस्त मिळत असल्याने आठवड्याचा भाजीपाला येथुनच खरेदी केला.शोभा पाटील, गृहिणी, कॉलेजरोड 

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीonionकांदा