शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:53 IST

सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे.

ठळक मुद्देकांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलोतासाभरातच १०० किलो कांदा विक्रीसेलिब्रिटींनाही भुरळ

 नाशिक : काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने मिळत असून गंगापुर रोडवरील सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी कांदा घेण्यासाठी याठिकाणी परिसरातील नागरिक गर्दी करत आहे.       रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे कुतकोटी सभागृहाच्या पार्किंगमध्ये काही दिवसांपासून प्रत्येक महिन्याच्या दुसºया व चौथ्या रविवारी ‘सेंद्रिय भाजीपाला’ उपलब्ध होत असतो. याठिकाणी जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी आपला सेंद्रिय शेतीमाल याठिकाणी विक्रीसाठी आणत असतात. कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला प्रतिक्विंटल ५ ते ६ हजार रुपये भाव मिळत असल्याने शहरातील किरकोळ बाजारात कांद्याला ७० ते ८० रुपये भाव मिळत असतांना सेंद्रिय बाजारात कांदा फक्त ३० रुपये किलो दराने मिळत असल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे रविवारी (दि.१०) फक्त १ तासातच १०० किलो कांदा विक्री झाला. येवल्यातील सदाशिव शेळके या शेतकऱ्यांने या बाजारात कांद्यासह, टमाटे, बटाटे, काकडी, वांगे, भोपळा, शिमला मिरचीसह इतर भाज्यांही विक्रीसाठी आणल्या होत्या. कांद्याप्रमाणे इतर भाज्यांचे दरही ३० रुपये प्रतिकिलो प्रमाणेच असल्याने सर्वच भाजीपाला ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या बाजारात कांद्यासोबत इतर भाजीपाला, फळभाज्या देखील उपलब्ध असून इतर बाजारभावापेक्षा त्यांचाही भाव अंत्यत कमी दिसून येत आहे. त्यात हा भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर झाल्याने ग्राहकांची याला चांगली पसंती मिळत आहे.सेलिब्रिटींनाही भुरळशेळके हे गेल्या १५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीचे उत्पन्न घेत असून गेल्या ११ वर्षांपासून ते दर रविवारी मुंबईतील बांद्रा येथे त्यांचा सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी नेत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी त्यांच्या कडून आमिर खान यांच्या पत्नी किरण राव, काजोलसह इतरही काही मोठ्या सेलिब्रिटी रांगेत उभे राहुन न चुकता भाजीपाला खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.आजवर शेती करत असतांना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करत केवळ सेंद्रिय खतांवर शेतीची उत्पादने घेत आलो आहे. शेतीसाठी नेहमीच शेणखताचा वापर करत आहे. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असून ही उत्पादने खाण्यासाठी चांगले आहे. त्यात मार्केटमध्ये कितीही बाजारभावात कितीही चढउतार झाला तरी आमच्याकडे भाव हा स्थिरच ठेवला जातो. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.सदाशिव शेळके, भाजीविक्रेतेअवकाळी पावसामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडल्यामुळे इतर बाजारात भाजीपाला खरेदी करतांना विचार करावा लागतो. मात्र याठिकाणी आल्यानंतर येथील भाज्यांचे दर बघुन मी आश्चर्यचकित झाले. कांदा फ क्त ३० रुपये किलोने मिळत असल्याचे बघून लगेच खरेदी केला. तसेच इतर भाजीही बाहेरील बाजारापेक्षा स्वस्त मिळत असल्याने आठवड्याचा भाजीपाला येथुनच खरेदी केला.शोभा पाटील, गृहिणी, कॉलेजरोड 

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीonionकांदा