शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"बरे झाले, ह्यझारीतील शुक्राचार्य समोर आले!"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2022 00:12 IST

मिलिंद कुलकर्णी  मंत्र, यंत्र व तंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडलेल्या धाडी आणि सापडलेली मोठी ...

ठळक मुद्देआरोग्य, आदिवासी विकास, सहकार विभागातील अनागोंदी उघड; लाभार्थी वाऱ्यावरविधिमंडळातही गाजला कांदे-भुजबळ वादराज ठाकरेंचे आता नाशिककडे लक्षशिंदे सेनेचे सुकाणू कुणाच्या हाती?कॉंग्रेसजन अखेर उतरले रस्त्यावरमविप्र निवडणुकीत लोकसभेची चाचपणी

मिलिंद कुलकर्णी मंत्र, यंत्र व तंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडलेल्या धाडी आणि सापडलेली मोठी अपसंपदा धक्कादायक आहेच; पण नाशिकच्या प्रतिमेला ठेच पोहोचविणारी आहे. सामान्य माणसाच्या करातून जमा होणारा निधी सार्वजनिक कामे, समाजातील उपेक्षित घटक यांच्या विकासासाठी वापरला जातो. पण हा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हे या कारवायांवरून पुन्हा एकदा समोर आले. आरोग्य विभागातील अधिकारी त्याच विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याचे रजा रोखीकरणाचे काम करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून पकडला जातो. आदिवासी वसतिगृहात मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्याचे कंत्राट मिळालेल्या ठेकेदाराकडून अभियंता २८ लाखांची लाच मागितल्याच्या आरोपावरून पकडला जातो. त्याच्या निवासस्थानी दीड कोटींची रोकड सापडते. वसाकावर आयकर विभागाची धाड पडते. भ्रष्टाचाराची कीड सगळी व्यवस्था कशी पोखरते आहे, हे अशा घटनांमधून ठळकपणे स्पष्ट झाले. त्यामुळेच शासकीय कामे गुणवत्तापूर्ण होत नाही. निकृष्ट कामांचा त्रास सामान्यांना होतो.विधिमंडळातही गाजला कांदे-भुजबळ वादसरकार बदलले की, समीकरणे बदलतात. महाविकास आघाडी सरकार गेले आणि शिंदेसेना व भाजपचे सरकार आले. पूर्वी पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्याविरुद्ध निधीवाटपावरून संघर्ष करणाऱ्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आता थेट विधिमंडळात आवाज उठविला. भुजबळ यांच्या क्लीन चिटला राज्य सरकारने आव्हान का दिले नाही, अशी विचारणा त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशीदेखील त्यांचा याविषयावरून वाद झाला. या घडामोडींवरून भुजबळ-कांदे वाद हा पुढे आणखी चिघळेल, असे चित्र दिसत आहे. आघाडीकडून ह्यखोक्यांह्णचे आरोप जसे वाढतील, तसे आघाडीच्या नेत्यांविरुद्धची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी शिंदेसेना आक्रमक पवित्रा घे्ईल, अशी रणनीती दिसते आहे. त्याचे पडसाद स्वाभाविकपणे स्थानिक पातळीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यातूनच टोल नाक्यावर आंदोलनाची टूम निघाली, ती शिंदेसेनेच्या लोकप्रतिनिधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. हा संघर्ष आणखी किती वळणे घेतो, हे बघायचे.राज ठाकरेंचे आता नाशिककडे लक्षशिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नवा पक्ष काढलेल्या राज ठाकरे यांच्यावर नाशिककरांनी विश्वास दाखवत महापालिकेची सत्ता बहाल केली होती. आमदारदेखील निवडून दिले. त्यामुळे राज आणि नाशिककर यांच्यात वेगळे नाते निर्माण झाले आहे. मुंबई, ठाणे, पुण्यानंतर राज हे नाशिकवर लक्ष केंद्रित करीत आहेत. मध्यंतरी संदीप देशपांडे, प्रकाश महाजन या साथीदारांना त्यांनी नाशिकला पाठविले. अमित ठाकरे हे चार दिवस येऊन गेले. संघटनेची पुनर्बांधणी करीत असताना युवकांवर अधिक भर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज यांची शस्त्रक्रिया आणि महाराष्ट्रातील सत्ताबदल एकाचवेळी घडले. त्यापूर्वी मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा या विषयावर राज आणि मनसे पुन्हा एकदा राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. मात्र, सत्तांतरानंतर समीकरण बदलले. भाजप आणि मनसेची युती होईल, असे चित्र निर्माण झाले असताना एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपला सत्तेत वाटा मिळाला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी माणूस, हिंदुत्व हे विषय हिरिरीने मांडणारी शिंदे सेना वाटेकरी झाली.शिंदे सेनेचे सुकाणू कुणाच्या हाती?शिवसेनेतील बंडानंतर खासदार हेमंत गोडसे, आमदार दादा भुसे, सुहास कांदे हे तिन्ही लोकप्रतिनिधी शिंदे सेनेत गेल्याने मूळ शिवसेनेत लोकप्रतिनिधी कोणीही उरलेले नाही. त्यात कांदे हे जिल्हाप्रमुख होते. बंडानंतर त्यांचे पद काढून घेण्यात आले. शिवसेनेने खांदेपालट करीत निष्ठावंतांना पुन्हा पदे बहाल केली; परंतु दोन महिन्यांनंतरही शिंदे सेनेत अद्याप पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. तिन्ही लोकप्रतिनिधींचे मतदारसंघात वलय आहे, कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, विस्ताराच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीची गरज प्रत्येक राजकीय पक्षाला असते. तशी ती शिंदे सेनेलाही आहेच. इतर जिल्ह्यात पदाधिकारी निवड केली जात असली तरी नाशिकमध्ये शांतता आहे. दादा भुसे यांना मंत्रिपद देण्यात आले. कांदे यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली जाते की, एखादा आणखी सक्षम नेता शोधून त्याच्याकडे जबाबदारी देण्याची रणनीती आखली जाते, याविषयी उत्सुकता आहे. जशा निवडणुका जवळ येतील, तशी शिंदे सेनेत आवक वाढेल, अशीही चर्चा आहे.कॉंग्रेसजन अखेर उतरले रस्त्यावरकॉंग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत गोंधळ, संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, याविषयी दिल्लीत जसा गोंधळ सुरू आहे, तसाच गोंधळ नाशिकात शहराध्यक्ष कोण असावे, यावरून सुरू आहे. चिंतन शिबिरात ठरलेले सूत्रदेखील अमलात आले नाही. दोनदा प्रदेश निरीक्षक येऊन गेले; पण अद्याप निर्णय झालेला नाही. आता निवडणुकाच महिनाभर पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा असल्याने हा विषय पुन्हा लांबणीवर पडणार आहे. दिल्लीवरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे कार्य कॉंग्रेसजन प्रामाणिकपणे करीत आहेत. महागाईविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आदेश आले, त्याचे तंतोतंत पालन झाले. ह्यमहागाईपे चर्चाह्ण झाली. मोजके कार्यकर्ते आणि मोजके लोक असे त्याचे स्वरूप होते. आता भारत जोडो यात्रा सुरू होत आहे. त्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात येऊन गेले. त्यांनी नवा शहराध्यक्ष आठवडाभरात नियुक्त होईल, अशी ग्वाही दिली. पण महिना उलटला, प्रतीक्षा कायम आहे. कुणी पद घ्यायला तयार नाही, असे तर नाही ना?मविप्र निवडणुकीत लोकसभेची चाचपणीमविप्र निवडणुकीच्या माध्यमातून काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची चाचपणी चालविली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. आमदारकीची जागा कन्या सिमंतिनीसाठी सोडून दिल्लीला जाण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माजी खासदार समीर भुजबळ हे त्यांचे स्पर्धक आहेत. हेमंत गोडसे हे शिंदेसेनेत गेल्याने भाजप-शिंदेसेनेत त्यांचे तिकीट निश्चित मानले जात असले तरी भाजपचे चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर तसेच नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनाही लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दोघांचे भाऊ मविप्र निवडणुकीत प्रगती पॅनलचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही चाचपणी सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांचीही लोकसभा निवडणूक लढविण्याची प्रबळ इच्छा आहे. पक्षांतर्गत स्पर्धा जोरदार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग