शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

चांदवड तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांना १८ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:48 PM

चांदवड : तालुक्यात १४ गावे, ५२ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, दररोज १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच चांदवड तालुक्यातील बऱ्याच गावांवर विहिरी, बोअरवेल, जलसाठे कोरडेठाक पडल्याने बºयाच भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. मे महिनाी संपत आला तरी पाणीटंचाईची समस्या कायम आहे.

तालुक्यातील भयाळे व गोहरण या दोन गावांचे तसेच १८ वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्या गावांनाही लवकरच टॅँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. ४४ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या टाकीवरून एवढ्या गावांची तहान भागत नसल्याने निफाड तालुक्यातील शिवरे येथील विहीर अधिग्रहीत केली असून, तेथून पाणी भरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या विहिरीचेही पाणी किती दिवस पुरेल याबाबत प्रशासनाने शंका व्यक्त केली असून यंदाचा दुष्काळ तीव्र असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील व पाणीपुरवठा अधिकारी सी.जे. मोरे यांनी दिली. चांदवड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्याच्या मध्यावर तालुक्यातील जलसाठ्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ, उसवाड, नांदुरटेक, राहुड, नारायणगाव, कुंडाणे, खडकओझर, गुºहाळे या चौदा गावांसह हिरापूर येथील धनगरवाडी, तळेगाव रोही येथील दत्तवाडी, घुमरे वस्ती, बजरंगनगर व काजीसांगवी येथील दुर्गानगर, भाटगाव येथील माळी वस्ती, नांदुरटेक येथील चिचंबारी वस्ती, शिंगवे येथील झाल्टे, मढे , रामवाडी, खताळ, शिंदे, शेख, गुंड, रायपूर येथील बारभाई, मदरवाडी, रानमळा, गंगावे, दुगाव रोड, तुकाराम वाडी, कातरवाडी येथील रानमळा, भडाणे येथील पट्टीचा मळा, दत्तवाडी, मेसनखेडे खुर्द येथील ठोंबरे वस्ती, मार्कंड वस्ती, जेजुरे वस्ती, निंबाळे येथील कोल्हे, खर्डी, गाढे, पाटोळेवस्ती, शिंदे तर गंगावे येथील नरोटेवस्ती व राजदेरवाडी येथील भामदरी वस्ती, काळखोडे येथील शेळके वस्ती, डुकरे वस्ती, वाकी खुर्द येथील देवढेवस्ती, गोरडे वस्ती, पन्हाळे येथील सोनवणे वस्ती, देवरगाव येथील गोधडेवस्ती, पिंपळवस्ती, गायराण वस्ती, रेडगाव खुर्द येथील काळेवस्ती, साळसाणे येथील ठाकरे, शिंदे वस्ती, तळेगाव रोही येथील आंबेडकर वस्ती, मल्हारनगर, वाहेगावसाळ येथील मुस्लीम वस्ती, खैरे वस्ती, गांगुर्डे वस्ती, वाणी मळा तर कोलटेक येथील खांगळवस्ती, पाटे येथील शिंदे वस्ती, वाकी बुद्रूक येथील शेलार वस्ती, वडगावपंगू येथील कांडेकर वस्ती, गोजरे वस्ती, शिरुर येथील कारवाडी, नन्हावे येथील मोगलवस्ती, खडकओझर, गु-हाळे, विटावे येथील योगेश्वरवस्ती, सोनीसांगवी, ठाकरे वस्ती या ५२ वाड्यांना १८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभातून टॅँकरच्या दररोज फेºया होत आहेत. शासनाकडे मागणी करण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावातील प्रस्तावांच्या मंजुरीअगोदर त्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे की नाही याची शहानिशा केल्यानंतरच प्रस्ताव सादर करा, असे प्रशासनाचे निर्देश असल्यानेच तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी केली जात आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई