शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्र कोरडे पडल्याने पाण्याची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:08 IST

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.नांदुरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रत तात्काळ पाणी सोडुन नदीलगतच्या तामसवाडी, खेडलेझुंगे, कानळद येथील बंधारे पाण्याने भरु न द्यावे अशी मागणी जोर धरु लागलेली आहे. लोकप्रतिनीधी व पाटबंधारे विभाग दरवर्षी तालुक्यातील इतर नद्यांना पाणी सोडुन वळण बंधारे भरु न देतात मग गोदावरी नदीपात्रावरच अन्याय का असा प्रश्न शेतकरी करु न लागलेले आहे. यावर्षी उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फेब्रुवारीच्या मध्यावरच गोदावरीचे नदीपात्र केरडेठाक पडलेले आहे. हातात आलेली पिके सोडून देण्यÞाची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.दरवर्षी उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतांना प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. सद्या लोकप्रतिनिधी जाहीर झालेल्या निवडणुकांच्या प्रचारात तर व अधिकारी आचार संहितेच्या पालनात व्यस्त आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी गोदाकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे जाणुबुजन दुर्लक्ष करत असुन याची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे.गोई, विनिता नदी पात्रता पाणी सोडून या नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची तीव्रता कमी केली जाते. मात्र हाच न्याय गोदावरीला लावला जात नाही.हा एकप्रकारे गोदाकाठच्या जनतेवर अन्याय केल्यासारखेच आहे. उलट गोदावरीत पाणी असतांना जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हट्टापायी गोदावरी नदीवरील वळण बंधाºयाचे दरवाजे काढुन पाण्याला मोकळीवाट करु न दिली. परिणामी आज हेच बंधारे पाण्याविना कोरडेठाक पडले आहे. घरणातील पाणी जसे काढले तसेच ते पुन्हा पाण्याने भरु न देणे गरजेचे असतांना याबाबत कुणीही बोलत नसल्याने त्याची मोठी किंमत या गावातील नागरिकांना मोजावी लागत आहे. खेडलेझुंगे, रु ई गावाला पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहीरीनेही तळ गाठलेला असल्याने गावाला ३ दिवसांनंतर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. गावाला नियमीत पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्याची कार्यवाही पुर्ण करण्याची मागणी होत आहे.मागील वर्षापेक्षा यावर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे चिन्ह सर्वत्र दिसत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाºया सार्वजनिक विहिरीने तळ गाठलेला आहे. त्यामुळे गावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे गोदावरीला जर तात्काळ पाणी सोडले गेले तर गोदावरीच्या किनारी वसलेल्या व परिसरातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.- सुषमा गिते,सरपंच, खेडलेझुंगे.उन्हाची तीव्रता इतकी आहे की ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक व परिसरातील विहिरींनी तळ गाठलेले आहे. त्यामुळे अधिग्रहण करण्यासाठी पाण्याची विहीर शोधणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. जर जुन्या कॅनॉलला रोटेशन दिले तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.- सी. जे. जाधव, ग्रामविकास अधिकारी, खेडलेझुंगे.