शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्र कोरडे पडल्याने पाण्याची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:08 IST

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण

खेडलेझुंगे : मागील महिन्यापासुन उन्हाची तीव्रता इतक्या प्रमाणावर वाढलेली आहे की, शेतकरी पुर्ता हैराण झालेला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीमाल जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी करत आहे. त्यात उन्हाची तीव्रता इतकी आहे की पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होवुन पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गोदावरीचे पात्र कोरडे पडलेले आहे. जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.नांदुरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रत तात्काळ पाणी सोडुन नदीलगतच्या तामसवाडी, खेडलेझुंगे, कानळद येथील बंधारे पाण्याने भरु न द्यावे अशी मागणी जोर धरु लागलेली आहे. लोकप्रतिनीधी व पाटबंधारे विभाग दरवर्षी तालुक्यातील इतर नद्यांना पाणी सोडुन वळण बंधारे भरु न देतात मग गोदावरी नदीपात्रावरच अन्याय का असा प्रश्न शेतकरी करु न लागलेले आहे. यावर्षी उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फेब्रुवारीच्या मध्यावरच गोदावरीचे नदीपात्र केरडेठाक पडलेले आहे. हातात आलेली पिके सोडून देण्यÞाची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.दरवर्षी उन्हाळ्यात नदीकाठच्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतांना प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. सद्या लोकप्रतिनिधी जाहीर झालेल्या निवडणुकांच्या प्रचारात तर व अधिकारी आचार संहितेच्या पालनात व्यस्त आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी गोदाकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे जाणुबुजन दुर्लक्ष करत असुन याची किंमत मात्र शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे.गोई, विनिता नदी पात्रता पाणी सोडून या नदीकाठच्या गावांची पाणीटंचाईची तीव्रता कमी केली जाते. मात्र हाच न्याय गोदावरीला लावला जात नाही.हा एकप्रकारे गोदाकाठच्या जनतेवर अन्याय केल्यासारखेच आहे. उलट गोदावरीत पाणी असतांना जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हट्टापायी गोदावरी नदीवरील वळण बंधाºयाचे दरवाजे काढुन पाण्याला मोकळीवाट करु न दिली. परिणामी आज हेच बंधारे पाण्याविना कोरडेठाक पडले आहे. घरणातील पाणी जसे काढले तसेच ते पुन्हा पाण्याने भरु न देणे गरजेचे असतांना याबाबत कुणीही बोलत नसल्याने त्याची मोठी किंमत या गावातील नागरिकांना मोजावी लागत आहे. खेडलेझुंगे, रु ई गावाला पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक विहीरीनेही तळ गाठलेला असल्याने गावाला ३ दिवसांनंतर चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. गावाला नियमीत पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रात तात्काळ पाणी सोडण्याची कार्यवाही पुर्ण करण्याची मागणी होत आहे.मागील वर्षापेक्षा यावर्षी पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार असल्याचे चिन्ह सर्वत्र दिसत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाºया सार्वजनिक विहिरीने तळ गाठलेला आहे. त्यामुळे गावी टॅकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे गोदावरीला जर तात्काळ पाणी सोडले गेले तर गोदावरीच्या किनारी वसलेल्या व परिसरातील गावांना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.- सुषमा गिते,सरपंच, खेडलेझुंगे.उन्हाची तीव्रता इतकी आहे की ग्रामपंचायत मालकीची सार्वजनिक व परिसरातील विहिरींनी तळ गाठलेले आहे. त्यामुळे अधिग्रहण करण्यासाठी पाण्याची विहीर शोधणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. जर जुन्या कॅनॉलला रोटेशन दिले तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल.- सी. जे. जाधव, ग्रामविकास अधिकारी, खेडलेझुंगे.