शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:33 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार ...

ठळक मुद्देप्रस्ताव येतात पण पडताळणीत फेटाळले जातात

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई असताना वरिष्ठांच्या असहकार्यामुळे टंचाईच्या प्रस्तावांची शहानिशा करण्याच्या नावाखाली कुठल्या तरी विहिरीला तीन ते चार दिवस पुरेल एवढे पाणी असले तरी प्रस्ताव फेटाळला जातो. अशा वेळी टीसीएल वगैरे जंतूनाशक वापरुन का होईना अशा विहिरीचे पाणी प्यावे लागत आहे.

टंचाईग्रस्त गाव त्यांच्या वाड्या, पाडे यांचा ग्रामपंचायतीचा प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन ग्रामसेवक असे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात कारवाईसाठी पाठवतात. त्यानंतर टंचाई शाखेचे संबंधित क्लर्क तो प्रस्ताव त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयात पोहोच करतात. त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला व तेथून टंचाई शाखेकडे प्रस्ताव पाठवला जाऊन तो मंजूर होण्यास वेळच लागतो. पण प्रस्ताव मंजूर होण्यापुर्वी परत तो पडताळणीसाठी पाठवला जातो.

या पडताळणीमध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली जाते. ४/५ दिवस पुरेल अशा विहिरींचे दूषित पाणी प्यायल्याने मग उलट्या डायरिया आदींचा ग्रामस्थांनी त्रास सहन केला आहे. तर काही वेळा साथीचे रोग उद्‌भवतात. अशा विहिरीचे पाणी संपले की तो प्रस्ताव मंजूर होण्यास तीन आठवडे किंबहुना महिनाभर तरी लागतो. त्यानंतर टँकर किंवा विंधन विहीर जसे टंचाई आराखड्यात नमूद केलेले असते तशी उपाययोजना केली जाते.

सध्या मुरंबी वेळुंजेचा हेदपाडा वेळे सोमनाथनगर मुळेगाव व विनायक नगरचा प्रस्ताव आला होता. पण विनायक नगर येथे ठक्करबाप्पा योजनेतून विहीर घेतली होती. त्या विहिरीत ४/५ दिवस पुरेल एवढे पाणी होते. म्हणून जिप लपाचे उपअभियंता यांनी विनायक नगरीचा प्रस्ताव फेटाळला. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर