शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा डाळिंब बागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:33 IST

विकतही पाणी मिळत नसल्याने बागा तोडण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की ठाणगाव व पाटोदा येथील शेतकºयांनी डाळिंब बागा केल्या भुईसपाट पाटोदा  : ...

ठळक मुद्देदरवर्षी कमी कमी होत जाणाºया पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होत असल्याने बाग जगविणे अवघड झाले. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडांना खोडकीड तसेच तेल्या या सारख्या रोगांनीही थैमान घातल्याने त्यांनी आपली डाळिंब बाग जमीनदोस्त केली आहे. पाण्याअभावी डाळींब बाग अखेरच

विकतही पाणी मिळत नसल्याने बागा तोडण्याची शेतकऱ्यांवर नामुष्कीठाणगाव व पाटोदा येथील शेतकºयांनी डाळिंब बागा केल्या भुईसपाटपाटोदा  : यावर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमुळे फळबागा अडचणीत सापडल्या आहे. फळबागा जोपासणे अवघड झाले आहे. बागेसाठी कुठेच पाणी उपलब्ध होत नाही, कुठे उपलब्ध झाले तर टँकरचा खर्च परवडत नाही त्यामुळे काय करावे या द्विधा मन:स्थितीत या भागातील शेतकरी सापडले आहे. त्यामुळे डाळिंब व द्राक्ष बागा तोडण्याची नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. पाणीटंचाईमुळे फळ धारणाही होत नसल्याने तसेच बागेवर खोडकीड व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ठाणगाव येथील अनिल बबन जाधव यांनी आपली एक एकर डाळिंब बाग मुळासकट ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली तर पाटोदा येथील शेतकरी अनिल सुकदेव गुंड या शेतकºयाने आपली दोन एकर डाळिंब बाग मजुरांच्या मदतीने कुºहाडीने तोडून टाकीत आपला संताप व्यक्त केला आहे.संपूर्ण येवला तालुक्यात यावर्षी भयाण दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी वर्ग पर्यायाने शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या भागात शेकडो हेक्टर डाळिंब तसेच द्राक्ष बागा आहेत. पोटच्या मुलाबाळांप्रमाणे जीव लावलेल्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर शेतकरी बागा जगविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहे; मात्र त्यांना यश येत नाही. यावर्षी परिसरात संपूर्ण पावसाळ्यात रिमझिम पाऊस झाल्याने खरीप हंगाम व त्यानंतर रब्बी हंगामही वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरींना थेंबभरही पाणी न उतरल्याने भयाण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात नाही तर नंतर का होईना बेमोसमी पाऊस पडेल अशी शेतकºयांना आशा होती; मात्र त्यानंतरही परिसरात पाऊस पडलाच नाही, त्यामुळे विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत झाल्याने पिके ब बागा जगविणे अवघड झाल्याने या शेतकºयांनी बागांना जमीनदोस्त केले आहे. ठाणगाव येथील तरु ण शेतकरी अनिल बबन जाधव यांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी आपल्या एक एकर शेतात डाळिंब लागवड केली होती; मात्र दरवर्षी कमी कमी होत जाणाºया पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होत असल्याने बाग जगविणे अवघड झाले. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडांना खोडकीड तसेच तेल्या या सारख्या रोगांनीही थैमान घातल्याने त्यांनी आपली डाळिंब बाग जमीनदोस्त केली आहे. पाण्याअभावी डाळींब बाग अखेरची घटका मोजू लागल्याने पाटोदा येथील अनिल गुंड या शेतकºयानेही आपली दोन एकर डाळिंब बाग मजूर तसेच स्वत: कुºहाडीने संपूर्ण डाळिंब बाग भुईसपाट करून संताप व्यक्त केला आहे. गुंड यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी आपल्या शेतात सेंदरी या वाणाची लागवड केली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. बागेला पाणीपुरवठा करण्यासाठी ड्रिपची व्यवस्था केली होती; मात्र भीषण दुष्काळाचा फटका या बागेलाही बसला त्यामुळे संपूर्ण बाग सुकून चालली होती. विहिरीत थेंबभरही पाणी नसल्याने टॅँकरद्वारे पाणी आणून बाग जगविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने त्यांनी आपल्या डाळिंब बागेला भुईसपाट केले.*येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात ठाणगाव, कानडी, आडगाव रेपाळ, विखरणी, कातरणी, दहेगाव, पाटोदा, पिंपरी व परिसरात हजारो एकर द्राक्ष तसेच डाळिंब बागा आहेत; मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून पर्जन्यमान कमीकमी होत चालल्याने बागा जगविणे अवघड होत आहे. त्यातच यावर्षी भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याने बागा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी द्राक्ष तसेच डाळिंब बागा तोडण्याचा सपाटा लावला आहे.* पाटोदा परिसराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण विहिरी व बोअरवेल केव्हाच कोरडेठाक पडले आहेत, त्यामुळे शेतकरी बागा वाचविण्यासाठी मिळेल तेथून पाणी आणून बागांना देण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र टँकरने पाणी आणण्यासाठी एका खेपेला पाच सहा हजार रु पये खर्च येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.* यावर्षीच्या भीषण पाणीटंचाईमुळे संपूर्ण बाग सुकून गेली. उपलब्ध पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु बाग वाचविण्यात यश न आल्याने बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. - अनिल सुकदेव गुंड, डाळिंब उत्पादक शेतकरी, पाटोदा.* डाळिंब बागेवर खोडकीड तसेच तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तसेच भीषण पाणीटंचाईमुळे बाग सुकू लागली, बाग वाचविण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने यामुळे अडचण निर्माण झाली. अगदी निराशेतून बाग तोडावी लागली. - अनिल बबन जाधव, डाळिंब उत्पादक शेतकरी, ठाणगाव.