शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 9:11 PM

सायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : विहिरी, बोअरवेल्सवर लाखोंचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : सातत्याने दुष्काळी ठरलेल्या येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या पावसाळ्यात विक्रमी पर्जन्यमान होऊनही यंदा पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यातूनच शेतपिके वाचविण्यासाठी बोअरवेल्स, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड सुरू झाली आहे.तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेती व्यवसाय विशेषत: निसर्गावरच अवलंबून आहे. पर्यायी पाटपाण्याची सुविधा नसल्याने या भागातील रब्बी हंगामातील पिकांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतकरी खरीप हंगामातील मिळालेली मिळकत व कर्जावू घेतलेला पैसा रब्बीचे पिके वाचविण्यासाठी विहिरी व बोअरवेल खोदण्याचा केविलवाणा प्रयत्न वर्षानुवर्ष करत आला आहे.साठ फूट खोलीची विहीर खोदून बांधायची म्हटल्यावर चार ते पाच लाखांचा खर्च येतो. सरासरी दोनशे फूट बोअरवेल्स घ्यायचा तर १५ हजार रुपये लागतात. पर्यायी पाट पाण्याची सुविधा नसलेल्या उत्तर-पूर्व भागातून दरवर्षीकोट्यवधी रुपये खर्च होताना दिसतात. त्यात शंभरात एखाद्या विहिरीला अथवा बोअरला पाणी लागते, तेही दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर-पूर्व भागातील सुमारे ६० खेड्यांतून दरवर्षी ३०० विहिरी नव्याने खोदल्या जातात तर हजारो बोअरवेल्स घेतले जातात.कोट्यवधींचा जुगारतालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३८ मिलिमीटर इतके आहे. यंदाच्या हंगामात विक्र मी पर्जन्य होऊनही उत्तर - पूर्व भागाला आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी विहिरी, बोअरवेल्स वाढतच आहे. मात्र रब्बी हंगामाचे लागवड क्षेत्र वाढताना दिसत नाही. याचा अर्थ पाण्याच्या शोधार्थ नाशिबावर हवाला ठेवून शेतकरी दरवर्षी कोट्यवधीचा जुगारच खेळतो आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater shortageपाणीकपात