शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणी टंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:43 IST

खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही.

ठळक मुद्दे खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले.प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही.पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

मालेगाव - खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. यामुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील पांगरीकुटे या गावापासून जवळच खेडी नावाचे गाव वसलेले आहे. गावात पाणीपुरवठ्याचा कुठलाही प्रभावी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातच गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तशीच गंभीर परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने टँकरव्दारे गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे; परंतु टँकर अद्याप सुरू झालेले नाही.

ऋषी महाराज संस्थानवरील भोजनावळींवरही परिणाम

खेर्डी येथे ऋषी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. याठिकाणी मालेगाव तालुकाच नव्हे; तर नजिकच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यानिमित्त सोमवारी, गुरूवारी प्रसाद म्हणून भोजन दिले जाते. यंदा मात्र भीषण पाणीटंचाईमुळे या धार्मिक कार्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामपंचायतीचे प्रयत्न ठरले निष्फळ

रेगाव-खेर्डी गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विलास नवघरे, सरपंच वेणूबाई रमेश खंडारे, उपसरपंच ज्ञानेश्वर बापूराव आंधळे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी खेर्डी गावाला तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा ठराव घेवून तो मालेगाव पंचायत समितीला सादर केला; मात्र ग्रामपंचायतीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले असून टँकर अद्याप सुरू झालेले नाही. 

गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

खेर्डी गावाला विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करा; अन्यथा मालेगाव पंचायत समिती व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सरपंच वेणूबाई खंडारे, उपसरपंच आंधळे, कल्पना गायकवाड, सत्यभामा काळे, सिंधू सातपुते, रेखा घुगे, कान्होपात्रा आंधळे, सुनिता शेंडगे, कल्पना शेंडगे, काळुबाई कालापाड, लक्ष्मीबाई इंगोले, प्रतिभा गायकवाड, नेहा आंधळे, अरूणा थिटे, लक्ष्मी काळे, सुभद्रा आंधळे, कौशल्या भेंडेकर आदिंनी दिला आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिकMalegaonमालेगांव