शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

राजापूर येथे पाणी बचतीला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:26 IST

येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.

ठळक मुद्देउन्हाची दाहकता : टंचाईच्या भीतीने शेतकऱ्यांकडून काटकसर

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे.राजापूर परिसरात यावर्षी काही प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले असले तरी येथे दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागतात. राजापूर वाडी-वस्त्यांवरील नागरिक विहिरीमध्ये पाणी शिल्लक ठेवून उन्हाळात पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी पुरेल म्हणून आत्तापासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे. अजून पाच सहा महिने पाणी पुरेल या हेतूने पाणीबचत शेतकरीवर्ग करीत आहे.राजापूर व परिसरात उन्हाळ कांदा लागवड ही फक्त शेततळे असलेल्या शेतकºयांची आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पिण्यासाठी दररोज २०० ते ३०० लिटर पाणी एका कुटुंबाला लागते. त्यामुळे शेतकरीवर्ग आत्तापासूनच पाणी वाया न घालवता विहिरीत ते साठवून पुढील काही महिने पाणी पुरेल या हेतूने बचत करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पुढील काही दिवसात पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग विहिरीमध्ये पाणी साठवून ठेवत आहे. राजापूरकरांच्या नशिबी दुष्काळाच्या झळा कायमच आहे. तालुक्याची पूर्व भागाची परिस्थिती ही दिवसेंदिवस भयानक होत आहे. साठवून ठेवलेल्या पाण्यावरच चार-पाच महिने काढावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पाणी वापर काटकसरीने करीत आहे. पाणी संकट उभे राहिल्याने महिला वर्ग पाण्याचा वापर काटकसरीने करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी