गंगापूर, दारणा धरणांतून सोडले पाणी
By Admin | Updated: June 5, 2014 01:01 IST2014-06-05T00:47:32+5:302014-06-05T01:01:47+5:30
नाशिक : सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गंगापूर, दारणा धरणांतून सोडले पाणी
नाशिक : गंगापूर व दारणा समूह प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोडण्यात आलेले पाणी तालुकावार पुरविणे आवश्यक आहे. ३१ जुलै २०१४ अखेर पिण्याचे पाणी शिल्लक राहावे म्हणून सुरू झालेल्या पाणी पाळी (आवर्तन) कालावधीमध्ये दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधारा व गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत गोदावरी व दारणा नदीवरील अनधिकृत उपसा करणार्या विद्युतपंपांचा विद्युतपुरवठा भारनियमन घेऊन खंडित करण्यात यावा. या कालावधीत नळपाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची संबंधित गावे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांनी खबरदारी घ्यावी. तसेच इंधनावर चालणारे सर्व अनधिकृत पंप व मोटारी जप्त करण्याची तसेच अनधिकृत विद्युतपंप जप्त करण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागाने तातडीने हाती घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)