शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:32 IST

कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली.

नायगाव : कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत नायगावचे सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांनी स्वत:च्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तीव्र टंचाईच्या काळातसरपंच कातकाडे यांनी केलेलेकाम परिसरात कौतुकाचा विषय ठरले.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नायगाव खोऱ्यात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात होणाºया पाणीपुरवठ्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी ठरू लागली होती. अशी टंचाईची परिस्थती असताना गावाला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे बनले होते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे ठरले; मात्र एवढ्या मोठ्या गावाला टँकरने किती व कसा पाणीपुरवठा होणार याचीही चिंता सर्वांना होती. अशा परिस्थितीत सरपंच नीलेश कातकाडे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देण्याची कल्पना घरातील सदस्यांसमोर मांडली. त्यास सर्वांनी पुण्याचे काम होत असल्याने सहमती दर्शविली.गेल्या पंधरा दिवसांपासून कातकाडे यांच्या विहिरीवरून ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धिकरणामार्फत नळयोजनेला पाणी सोडले जात आहे. कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सरपंच कातकाडे यांच्या सहकार्याने सध्या दिवसाआड सुरू झाला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावाप्रती दाखविलेला जिव्हाळा सर्वांनाच आपुलकीचा गारवा निर्माण करणारा ठरला आहे.टंचाईच्या काळात पिकाऐवजी गावाला पाणी दिल्यामुळे शेतातील पिकांना विशेषत: एक एकर कोथिंबीर पिकास मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNashikनाशिक