शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:32 IST

कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली.

नायगाव : कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत नायगावचे सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांनी स्वत:च्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तीव्र टंचाईच्या काळातसरपंच कातकाडे यांनी केलेलेकाम परिसरात कौतुकाचा विषय ठरले.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नायगाव खोऱ्यात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात होणाºया पाणीपुरवठ्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी ठरू लागली होती. अशी टंचाईची परिस्थती असताना गावाला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे बनले होते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे ठरले; मात्र एवढ्या मोठ्या गावाला टँकरने किती व कसा पाणीपुरवठा होणार याचीही चिंता सर्वांना होती. अशा परिस्थितीत सरपंच नीलेश कातकाडे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देण्याची कल्पना घरातील सदस्यांसमोर मांडली. त्यास सर्वांनी पुण्याचे काम होत असल्याने सहमती दर्शविली.गेल्या पंधरा दिवसांपासून कातकाडे यांच्या विहिरीवरून ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धिकरणामार्फत नळयोजनेला पाणी सोडले जात आहे. कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सरपंच कातकाडे यांच्या सहकार्याने सध्या दिवसाआड सुरू झाला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावाप्रती दाखविलेला जिव्हाळा सर्वांनाच आपुलकीचा गारवा निर्माण करणारा ठरला आहे.टंचाईच्या काळात पिकाऐवजी गावाला पाणी दिल्यामुळे शेतातील पिकांना विशेषत: एक एकर कोथिंबीर पिकास मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNashikनाशिक