शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पिकाचे पाणी बंद करून ग्रामस्थांना दिले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:32 IST

कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली.

नायगाव : कधी नव्हे एवढी पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थती निर्माण झाल्याने गंगेकाठी वसलेल्या नायगावकरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार अशी स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत नायगावचे सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांनी स्वत:च्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तीव्र टंचाईच्या काळातसरपंच कातकाडे यांनी केलेलेकाम परिसरात कौतुकाचा विषय ठरले.यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर तालुका तीव्र पाणीटंचाईच्या संकटात सापडला आहे. गोदावरीच्या काठावर वसलेल्या नायगाव खोऱ्यात कधी नव्हे एवढी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात होणाºया पाणीपुरवठ्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी ठरू लागली होती. अशी टंचाईची परिस्थती असताना गावाला पाणीपुरवठा करणे जिकिरीचे बनले होते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे ठरले; मात्र एवढ्या मोठ्या गावाला टँकरने किती व कसा पाणीपुरवठा होणार याचीही चिंता सर्वांना होती. अशा परिस्थितीत सरपंच नीलेश कातकाडे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देण्याची कल्पना घरातील सदस्यांसमोर मांडली. त्यास सर्वांनी पुण्याचे काम होत असल्याने सहमती दर्शविली.गेल्या पंधरा दिवसांपासून कातकाडे यांच्या विहिरीवरून ग्रामपंचायतीच्या जलवाहिनीद्वारे जलशुद्धिकरणामार्फत नळयोजनेला पाणी सोडले जात आहे. कधी आठ, तर कधी पंधरा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा सरपंच कातकाडे यांच्या सहकार्याने सध्या दिवसाआड सुरू झाला आहे. तीव्र पाणीटंचाईच्या काळात गावाप्रती दाखविलेला जिव्हाळा सर्वांनाच आपुलकीचा गारवा निर्माण करणारा ठरला आहे.टंचाईच्या काळात पिकाऐवजी गावाला पाणी दिल्यामुळे शेतातील पिकांना विशेषत: एक एकर कोथिंबीर पिकास मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीNashikनाशिक