शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

दारणा धरणातून पाणी विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:59 IST

लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती.

भगूर : लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र भरारीपथक नियुक्त करून शेतकऱ्यांच्या पंपमोटारी काढण्याची ताकीद देऊन तेव्हाच पाणी सोडण्याची इशारा दिला. तशी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रविवारी दुपारी पाणी सोडले व चेहेडी बंधारा भरल्यानंतर बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे १५ दिवसांचे संकट टळले आहे.भगूर नदी एमईएस लष्करी बंधारा ते नाशिकरोडचा चेहडीबंधारा कोरडाठाक पडला होता. परिसरातील शहर गावाना एक दिवस मिळेल ऐवढेच पाणी राहिले होते. त्यावेळी लष्करी छावणी परिषद, भगूर, सिन्नर नगर परिषद औद्योगिक विकास मंडळ यांच्या पाणी रोटेशन मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने भरारी पथक नेमले़ प्रथम सर्व शेतकऱ्यांच्या पंप मोटारी जप्त करा, तरच पाणी विसर्ग केला जाईल, असा सक्त आदेश दिला. भरारीपथकाने ५९ पंपमोटारी जप्त केल्या, तरीही पाणी विसर्ग होईना मात्र लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दखल घेऊन जलसंपदा उपविभागीय अभियंता पी. एम. कुलकर्णी, पी. एस. शेख, रवींद्र संसारे, वाणीयांच्यासह विविध अधिकारी यांनी दारणा नदीच्या काठावर बैठक घेऊन पोलीस संरक्षण मागणी चर्चा करून लष्करी अधिकारी यांनी जवान सोबत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाणीचोरी होऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांना दिल्याने नंतर जलसंपदा विभागाने भगूर त चेहेडी बंधारा भरेल ऐवढेच पाणी सोडले. त्यामुळे तूर्तास पाणीटंचाई दूर झाली आहे़दरम्यान, लहवित, बाजिगरा, भगूर ते नाशिकरोड, चेहेडी बंधारा परीसर काठावरील ४०० शेतकºयांच्या मोटारी पंप आहे आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा हेच शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उचलतात त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी समस्या निर्माण होते करीता जलसंपदा पाणीवापर संस्था अधिकारी यांचे भरारी पथकसोबत वीजकामगार व लष्करी जवान यांनी ४०० शेतकरी यांना प्रत्यक्ष भेटून पाणीचोरी रोखण्याचा दि.३१ जुलैपर्यंत प्रयत्न करू नये, असा सक्त तोंडी आदेश दिला आणि गस्त चालू ठेवली आहे.पाणीचोरी केल्यास गुन्हे दाखलबेकायदेशीर पाणीचोरीचा प्रयत्न केला तर त्या शेतकºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे़कोटेकोर अंमलबजावणी झाली तर निदान परिसरातील नागरिकांना १५ दिवस पाणी मिळेल. जर शेतकºयांनी पाणी चोरले तर नागरिकांना पिण्यासाठी फक्त पाच दिवस पुरेल नंतर रोटेशन पाणी मिळणे अशक्य होण्याची शक्यता असल्याचे समजते.  शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थिती पाहून पाणीचोरी करू नये, असे आवाहन भरारी पथकाने केले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी