शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
2
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
3
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
4
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
5
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
6
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
7
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
8
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
9
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
10
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
11
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
12
आजचा अग्रलेख: अखेर पिपाणीचा आवाज बंद!
13
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
14
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
15
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
16
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
17
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
18
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
19
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
20
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दारणा धरणातून पाणी विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:59 IST

लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती.

भगूर : लहवित, भगूर, देवळाली कॅम्पसह नाशिकरोड, चेहेडी परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याने पाणीवापर संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे दारणा धरणातून पाणी रोटेशन विसर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र भरारीपथक नियुक्त करून शेतकऱ्यांच्या पंपमोटारी काढण्याची ताकीद देऊन तेव्हाच पाणी सोडण्याची इशारा दिला. तशी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच रविवारी दुपारी पाणी सोडले व चेहेडी बंधारा भरल्यानंतर बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे १५ दिवसांचे संकट टळले आहे.भगूर नदी एमईएस लष्करी बंधारा ते नाशिकरोडचा चेहडीबंधारा कोरडाठाक पडला होता. परिसरातील शहर गावाना एक दिवस मिळेल ऐवढेच पाणी राहिले होते. त्यावेळी लष्करी छावणी परिषद, भगूर, सिन्नर नगर परिषद औद्योगिक विकास मंडळ यांच्या पाणी रोटेशन मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन फक्त पिण्याच्या पाण्यासाठी असल्याने भरारी पथक नेमले़ प्रथम सर्व शेतकऱ्यांच्या पंप मोटारी जप्त करा, तरच पाणी विसर्ग केला जाईल, असा सक्त आदेश दिला. भरारीपथकाने ५९ पंपमोटारी जप्त केल्या, तरीही पाणी विसर्ग होईना मात्र लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध होताच दखल घेऊन जलसंपदा उपविभागीय अभियंता पी. एम. कुलकर्णी, पी. एस. शेख, रवींद्र संसारे, वाणीयांच्यासह विविध अधिकारी यांनी दारणा नदीच्या काठावर बैठक घेऊन पोलीस संरक्षण मागणी चर्चा करून लष्करी अधिकारी यांनी जवान सोबत देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाणीचोरी होऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांना दिल्याने नंतर जलसंपदा विभागाने भगूर त चेहेडी बंधारा भरेल ऐवढेच पाणी सोडले. त्यामुळे तूर्तास पाणीटंचाई दूर झाली आहे़दरम्यान, लहवित, बाजिगरा, भगूर ते नाशिकरोड, चेहेडी बंधारा परीसर काठावरील ४०० शेतकºयांच्या मोटारी पंप आहे आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा हेच शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उचलतात त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी समस्या निर्माण होते करीता जलसंपदा पाणीवापर संस्था अधिकारी यांचे भरारी पथकसोबत वीजकामगार व लष्करी जवान यांनी ४०० शेतकरी यांना प्रत्यक्ष भेटून पाणीचोरी रोखण्याचा दि.३१ जुलैपर्यंत प्रयत्न करू नये, असा सक्त तोंडी आदेश दिला आणि गस्त चालू ठेवली आहे.पाणीचोरी केल्यास गुन्हे दाखलबेकायदेशीर पाणीचोरीचा प्रयत्न केला तर त्या शेतकºयांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकºयांना याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे़कोटेकोर अंमलबजावणी झाली तर निदान परिसरातील नागरिकांना १५ दिवस पाणी मिळेल. जर शेतकºयांनी पाणी चोरले तर नागरिकांना पिण्यासाठी फक्त पाच दिवस पुरेल नंतर रोटेशन पाणी मिळणे अशक्य होण्याची शक्यता असल्याचे समजते.  शेतकरी बांधवांनी दुष्काळी परिस्थिती पाहून पाणीचोरी करू नये, असे आवाहन भरारी पथकाने केले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी