शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

जलसंवर्धनाने घडली दोन गावांत हरितक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:08 PM

एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्य घडते आणि अन्य संस्थांसाठी ते कार्य आदर्शवत तसेच मार्गदर्शक ठरते. असेच जलसंवर्धनाचे विधायक कार्य सामाजिक उत्तरदायित्व या संस्थेने करून मुळेगाव आणि वाहेगाव या दोन दत्तक गावांमध्ये हरितक्रांती घडविली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलाच, परंतु विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

नाशिक : एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्य घडते आणि अन्य संस्थांसाठी ते कार्य आदर्शवत तसेच मार्गदर्शक ठरते. असेच जलसंवर्धनाचे विधायक कार्य सामाजिक उत्तरदायित्व या संस्थेने करून मुळेगाव आणि वाहेगाव या दोन दत्तक गावांमध्ये हरितक्रांती घडविली आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न मिटलाच, परंतु विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील सीटीआर या कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारून श्रमदानातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव व वाहेगाव या गावातील पाणीटंचाई दूर करून जलसंवर्धनाचे काम हाती घेतले. या दोन्ही दत्तक गावांमध्ये विहीर पुनर्भरणाचे पाच प्रकल्प राबविण्यात आले. यासाठी पुण्याच्या वनराई या सामाजिक संस्थेने मदत केली. या गावानजीकच ओढ्याचे खोलीकरण केले. त्याठिकाणी सुमारे चार हजार आंबा आणि पेरूच्या झाडांची लागवड करण्यात आली. शेतकºयांना बियाणांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे जलसंवर्धनाच्या या कामात गावातील पुरुषांबरोबर महिलांनीदेखील सहभाग घेतला. मातीच्या नालाबांधाची दुरुस्ती करण्यात आल्याने गावाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आता गावकºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही.  आता पावसाळा असल्याने पुरेसे पाणी आहे. परंतु पूर्वी उन्हाळ्यात पाणीटंचाई असायची आता येथे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकू लागला आहे.