शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कारसुळ नारायण टेंभीच्या पुलावरून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 8:47 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.

ठळक मुद्देदोन गावाचा संपर्क तुटला : अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कारसुळ नारायण टेंंभी गावाच्या मधून वाहणाऱ्या काळजीनदी नदीवर अनेक वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने थोड्याशा पावसातही पूल पाण्याखाली जातो. पावसाळ्यात नदीला कायम पाणी असल्याने ग्रामस्थांना पुलावरून जाणे धोक्याचे आहे.पावसाळ्यात या पुलावरून जाणे नागरिक टाळतात पण चार मिहन्यांचा पावसाळा संपूनही मुकाम ठोकल्या अवकाळीपावसामुळे या दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे.पुलावरून पाणी गेल्यास शेतक-यांना शेतात जाता येत नाही. विद्यार्थ्यांची शाळेला दांडी पडते तर अनेकांचा रोजगार बुडतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी करूनही त्याची योग्य दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात या पुलावरून ये-जा करणारी व प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेली एसटी बस कारसुळ गावात येते पण पुलावरून पाणी असल्याने नारायण टेम्भी येथील गावकर्यांना बसची सेवाही खंडीत होते. या दोन्ही गावात पराशरी व काजळी या नद्यांचे संगम होऊन त्या तिसर्या कादवा नदीला मिळतात यामुळे तीन नद्यांचे संगम असलेले हे दोन्ही गावांमध्ये पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या नद्यांना जलप्रवाहाला पावसात मोठा वेग असतो. मुसळधार पाऊस झाल्यास पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाशी जोडलेल्या या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो.काजळी नदीवरील हा पूल जुना आहे. मो-यांवर हा पूल बांधण्यात आला आहे. नदीच्या पाण्यातून केवळ पाच फूट उंचीवर हा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुलालगतच पाणी जाते. पुलाच्या टोकाजवळ रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रस्ता खड्डयÞांत गेला आहे. पूलही ठिकठिकाणी खचला आहे. माध्यमिक शाळा कारसुळ या गावी असल्याने नारायण टेम्भी येथील शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून या पुलावर जावे लागते .त्यामुळे पाणी वाढून कधीही मोठी हानी होईल , अशी भिती आहे. या बाबत नारायण टेंभी येथील सरपंच अजय गवळी यांनी वेळीवेळी ग्रामसभेत ठराव केला होता. व नवा पूल बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. नारायण टेम्भी येथील शाळेत जाणार्या मुलांच्या ऊंच्या वाढल्या पण या दोन्ही गावांना जोडणार्या या नदीवरील पुलाची उंची काही वाढली नाहीमात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनाचा जीव गेल्यावरच या विभागाला जाग येतेकी काय असा सवाल येथील नागरिक करीत आहे.कोट....आमदार खासदार यांना वेळोवेळी सांगूनही या नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही आजपर्यंत फक्त येथील विद्यार्थी ,ग्रामस्थ व शेतकर्यांना आश्वासन मिळाले पण आता नविनर्वाचित आमदारांकडू या दोन्ही गावांना जोडणार्या पुलाची उंची वाढेल अशी नकीच अपेक्षा आहे- अजय गवळी,नारायण टेम्भी सरपंच 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी