शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:35 IST

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपल्याने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यंदाही नाशिक जिल्ह्यावर पडली आणि ऐन हिवाळ्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच पशुधनाचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १०९७ गावांमधील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहण्याची वेळ आली. ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ व २ डिसेंबरला अवकाळीचा पाऊस झाला. कोकण, मुंबईसह नाशकात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. नाशिक जिल्ह्यात गारठ्याने ८७२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गाय, वासरे व शेळ्या दगावल्याने मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. भात, मका, भुईमुग, सोयाबीन, नागली, वरई, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो व भाजीपाला आडवा झाला. मालेगाव, सटाणा, नांदगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत जादा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून आर्थिक नुकसानभरपाईचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

--इन्फो-

या पिकांना बसला सर्वाधिक फटका

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १०,५९९.०५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडली, शिवाय पावसाची संततधार लागल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. अनेक ठिकाणी तर बागेतील द्राक्षे गळून पडली तर तडेदेखील गेल्याने नुकसान झाले. कांदा पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रदेखील माेठे आहे. अवकाळीमुळे २३,२४२.३० हेक्टरवरील कांदा पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

--इन्फो--

नुकसानीचे पीक क्षेत्र (हे.)

जिरायत - ७२८.९०

बागायत - २६६५३.३०

बहुवार्षिक फळपिके - १०७१०.६५

--इन्फो--

तालुका             नुकसानीचे क्षेत्र (हे.)

मालेगाव--------- ९२१

सटाणा ----------२८३७

नांदगाव---------२५५०

कळवण---------८२७.७०

देवळा----------७०.००

दिंडोरी---------२२६५.८०

सुरगाणा--------३१.८०

नाशिक---------१४२४.६०

त्र्यंबकेश्वर------२२८.१०

इगतपुरी----------२५३.००

पेठ--------------१८.००

निफाड-------------१३२८.००

सिन्नर-------------५९२.९५

येवला----------------५३.३०

चांदवड-------------२४६९१.६०

एकूण--------------३८०९२.८५

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी