शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:35 IST

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपल्याने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यंदाही नाशिक जिल्ह्यावर पडली आणि ऐन हिवाळ्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच पशुधनाचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १०९७ गावांमधील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहण्याची वेळ आली. ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ व २ डिसेंबरला अवकाळीचा पाऊस झाला. कोकण, मुंबईसह नाशकात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. नाशिक जिल्ह्यात गारठ्याने ८७२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गाय, वासरे व शेळ्या दगावल्याने मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. भात, मका, भुईमुग, सोयाबीन, नागली, वरई, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो व भाजीपाला आडवा झाला. मालेगाव, सटाणा, नांदगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत जादा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून आर्थिक नुकसानभरपाईचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

--इन्फो-

या पिकांना बसला सर्वाधिक फटका

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १०,५९९.०५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडली, शिवाय पावसाची संततधार लागल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. अनेक ठिकाणी तर बागेतील द्राक्षे गळून पडली तर तडेदेखील गेल्याने नुकसान झाले. कांदा पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रदेखील माेठे आहे. अवकाळीमुळे २३,२४२.३० हेक्टरवरील कांदा पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

--इन्फो--

नुकसानीचे पीक क्षेत्र (हे.)

जिरायत - ७२८.९०

बागायत - २६६५३.३०

बहुवार्षिक फळपिके - १०७१०.६५

--इन्फो--

तालुका             नुकसानीचे क्षेत्र (हे.)

मालेगाव--------- ९२१

सटाणा ----------२८३७

नांदगाव---------२५५०

कळवण---------८२७.७०

देवळा----------७०.००

दिंडोरी---------२२६५.८०

सुरगाणा--------३१.८०

नाशिक---------१४२४.६०

त्र्यंबकेश्वर------२२८.१०

इगतपुरी----------२५३.००

पेठ--------------१८.००

निफाड-------------१३२८.००

सिन्नर-------------५९२.९५

येवला----------------५३.३०

चांदवड-------------२४६९१.६०

एकूण--------------३८०९२.८५

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी