शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

अवघ्या दोन दिवसांत ३८ हजार हेक्टरवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 01:35 IST

नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअवकाळीचा फटका : प्राथमिक अहवालानुसार कांद्याचे सर्वाधिक नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यात १ आणि २ डिसेंबर या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ३८ हजार ९२ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा आणि द्राक्ष पिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे. सुमारे २३ हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले असून द्राक्ष पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपल्याने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यंदाही नाशिक जिल्ह्यावर पडली आणि ऐन हिवाळ्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे तसेच पशुधनाचे मेाठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील १०९७ गावांमधील शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पाहण्याची वेळ आली. ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो, भाजीपाला तसेच आंबा, द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १ व २ डिसेंबरला अवकाळीचा पाऊस झाला. कोकण, मुंबईसह नाशकात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. नाशिक जिल्ह्यात गारठ्याने ८७२ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गाय, वासरे व शेळ्या दगावल्याने मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. भात, मका, भुईमुग, सोयाबीन, नागली, वरई, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो व भाजीपाला आडवा झाला. मालेगाव, सटाणा, नांदगाव या तालुक्यांमध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत जादा नुकसान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून आर्थिक नुकसानभरपाईचा अहवाल शासनाला सादर केला आहे.

--इन्फो-

या पिकांना बसला सर्वाधिक फटका

या अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांना चांगलाच फटका बसला. जिल्ह्यातील १०,५९९.०५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. या दोन दिवसांत कडाक्याची थंडी पडली, शिवाय पावसाची संततधार लागल्याने शेतकऱ्यांना द्राक्षे वाचविण्यासाठी औषध फवारणी करावी लागली. अनेक ठिकाणी तर बागेतील द्राक्षे गळून पडली तर तडेदेखील गेल्याने नुकसान झाले. कांदा पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रदेखील माेठे आहे. अवकाळीमुळे २३,२४२.३० हेक्टरवरील कांदा पीक पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला.

--इन्फो--

नुकसानीचे पीक क्षेत्र (हे.)

जिरायत - ७२८.९०

बागायत - २६६५३.३०

बहुवार्षिक फळपिके - १०७१०.६५

--इन्फो--

तालुका             नुकसानीचे क्षेत्र (हे.)

मालेगाव--------- ९२१

सटाणा ----------२८३७

नांदगाव---------२५५०

कळवण---------८२७.७०

देवळा----------७०.००

दिंडोरी---------२२६५.८०

सुरगाणा--------३१.८०

नाशिक---------१४२४.६०

त्र्यंबकेश्वर------२२८.१०

इगतपुरी----------२५३.००

पेठ--------------१८.००

निफाड-------------१३२८.००

सिन्नर-------------५९२.९५

येवला----------------५३.३०

चांदवड-------------२४६९१.६०

एकूण--------------३८०९२.८५

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी