शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:45 IST

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे.

नाशिक : नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ सांगणाºया पालिकेच्या गलथान कारभारावर काय कारवाई करायची असा प्रश्न परीसरातील नागरीक करीत आहेत. सदगुरूनगर- खांदवेनगरला लागून जाणाºया पाइपलाइन रस्त्यावर बळवंतनगर येथे २००७ मध्ये २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला. या जलकुंभातून परिसरातील गणेशनगर, बळवंतनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, आनंदवल्ली यासह अन्य भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडण्यात आलेली मुख्य जलवाहिनीच छताजवळ चहूबाजूने लिकेज् असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून २४ तास पाणीगळती होत असते. त्यामुळे जलकुंभाखाली भलेमोठे डबके साचले असून, त्याला तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जलकुंभाजवळच असलेला नालाही या पाण्याने बारमाही प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.स्थानिक जागरूक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना कळवूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधीत पाणीबचतीबाबत गंभीर आहे काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.प्रशासनाची अशीही शक्कलया जलकुंभातून सातपूर आणि गंगापूर परिसरांतील बºयाचशा नगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम हाती घेतल्यास नागरिकांना म्हणाव्या तेवढ्या वेगाने पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूणच लाखो लिटर पाणी वाया गेले तरी चालेल पण पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा अजब विचार प्रशासनाकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सदरचा जलकुंभ २००७ साली बांधण्यात आला आहे. मात्र काही वर्षांतच त्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या कमी कालावधी जलकुंभाची अशाप्रकारे दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मध्यंतरी महापालिकेने वॉटर आॅडिट केले, परंतु अशावेळीदेखील हा प्रकार आढळला नाही काय, असादेखील प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका