शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:45 IST

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे.

नाशिक : नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ सांगणाºया पालिकेच्या गलथान कारभारावर काय कारवाई करायची असा प्रश्न परीसरातील नागरीक करीत आहेत. सदगुरूनगर- खांदवेनगरला लागून जाणाºया पाइपलाइन रस्त्यावर बळवंतनगर येथे २००७ मध्ये २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला. या जलकुंभातून परिसरातील गणेशनगर, बळवंतनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, आनंदवल्ली यासह अन्य भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडण्यात आलेली मुख्य जलवाहिनीच छताजवळ चहूबाजूने लिकेज् असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून २४ तास पाणीगळती होत असते. त्यामुळे जलकुंभाखाली भलेमोठे डबके साचले असून, त्याला तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जलकुंभाजवळच असलेला नालाही या पाण्याने बारमाही प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.स्थानिक जागरूक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना कळवूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधीत पाणीबचतीबाबत गंभीर आहे काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.प्रशासनाची अशीही शक्कलया जलकुंभातून सातपूर आणि गंगापूर परिसरांतील बºयाचशा नगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम हाती घेतल्यास नागरिकांना म्हणाव्या तेवढ्या वेगाने पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूणच लाखो लिटर पाणी वाया गेले तरी चालेल पण पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा अजब विचार प्रशासनाकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सदरचा जलकुंभ २००७ साली बांधण्यात आला आहे. मात्र काही वर्षांतच त्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या कमी कालावधी जलकुंभाची अशाप्रकारे दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मध्यंतरी महापालिकेने वॉटर आॅडिट केले, परंतु अशावेळीदेखील हा प्रकार आढळला नाही काय, असादेखील प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका