शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बळवंतनगर येथील  जलकुंभातून २४ तास धो धो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:45 IST

नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे.

नाशिक : नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे चोवीस तास पाण्याची गळती असल्याने जलकुंभाला लागून असलेला नालाही प्रवाहित झाला आहे. एरवी या नाल्यात पावसाळ्यातच पाणी बघावयास मिळत असे. परंतु भर उन्हाळ्यात या नाल्यात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ सांगणाºया पालिकेच्या गलथान कारभारावर काय कारवाई करायची असा प्रश्न परीसरातील नागरीक करीत आहेत. सदगुरूनगर- खांदवेनगरला लागून जाणाºया पाइपलाइन रस्त्यावर बळवंतनगर येथे २००७ मध्ये २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ बांधण्यात आला. या जलकुंभातून परिसरातील गणेशनगर, बळवंतनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, सावरकरनगर, आनंदवल्ली यासह अन्य भागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या जलकुंभाला गळती लागली आहे. जलकुंभाला जोडण्यात आलेली मुख्य जलवाहिनीच छताजवळ चहूबाजूने लिकेज् असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून २४ तास पाणीगळती होत असते. त्यामुळे जलकुंभाखाली भलेमोठे डबके साचले असून, त्याला तळ्याचे रूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर जलकुंभाजवळच असलेला नालाही या पाण्याने बारमाही प्रवाहित झाल्याचे चित्र आहे.स्थानिक जागरूक नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला आणि स्थानिक नागरिकांना कळवूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधीत पाणीबचतीबाबत गंभीर आहे काय असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.प्रशासनाची अशीही शक्कलया जलकुंभातून सातपूर आणि गंगापूर परिसरांतील बºयाचशा नगरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या जलकुंभाचे बांधकाम हाती घेतल्यास नागरिकांना म्हणाव्या तेवढ्या वेगाने पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूणच लाखो लिटर पाणी वाया गेले तरी चालेल पण पाणीपुरवठा खंडित होऊ नये, असा अजब विचार प्रशासनाकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सदरचा जलकुंभ २००७ साली बांधण्यात आला आहे. मात्र काही वर्षांतच त्यातून पाण्याची गळती होत असल्याने त्याच्या बांधकामाबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या कमी कालावधी जलकुंभाची अशाप्रकारे दशा झाल्याने बांधकामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. मध्यंतरी महापालिकेने वॉटर आॅडिट केले, परंतु अशावेळीदेखील हा प्रकार आढळला नाही काय, असादेखील प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका