शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

सतर्कतेचा इशारा : हवामान खात्याच्या अंदाजामुळे चिंता वाढली जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:49 IST

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाचा येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेची देखील चिंता वाढली आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या तर शेतकऱ्यांना उरल्यासुरल्या पिकांची काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला देखील सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत.जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि त्यामुळे पिकांचे झालेले नुकसान यातून शेतकरी सावरत नाही तोच आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्'ातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्'ातील जवळपास सर्वच पिके नष्ट झाली आहे, तर द्राक्षांची मोठी हानी झाल्याने हंगामातील द्राक्ष उत्पादनदेखील कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हाती आलेले तसेच शेतातील उभे पीक वाहून गेल्यामुळे ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीची झळ कायम असताना जिल्ह्यात येत्या ६ ते ८ तारखेदरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकºयांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यापूर्वीच परतीच्या पावसाने नुकसान केले असताना आता अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. विशेषत: डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने यापूर्वी अवकाळी पाऊस झालेल्या तालुक्यांची हानी होण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाºया जिल्हा प्रशासनाला यंदा जूनपासूनच लहरी पावसामुळे धावपळ करावी लागत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लागलीच अवकाळी पावसाचे संकट आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आता आपत्ती निवारण आणि पंचनामन्याच्या कामाला जुंपली आहे.हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानंतर जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेषत: शेतकºयांचा उरलासुरला शेतमाल वाचवण्यिाचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेतकºयांना सावध राहण्याचा सल्ला देण्याबरोबर पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Rainपाऊस