राष्टÑवादीत नवा-जुना वाद सुरू
By Admin | Updated: June 3, 2014 23:30 IST2014-06-03T01:55:24+5:302014-06-03T23:30:42+5:30
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये नवा-जुना असा वाद सुरू झाला असून, त्यासाठी शहराध्यक्षपदाच्या संभाव्य फेरबदलाची चर्चा कारणीभूत ठरली आहे.

राष्टÑवादीत नवा-जुना वाद सुरू
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये नवा-जुना असा वाद सुरू झाला असून, त्यासाठी शहराध्यक्षपदाच्या संभाव्य फेरबदलाची चर्चा कारणीभूत ठरली आहे. या पदावर नेमणूक करताना पक्षाचा निष्ठावंत व दुसर्या पक्षातून न आलेल्या कार्यकर्त्यालाच न्याय दिला जावा अन्यथा राजीनामा देण्याचा इशारा पक्षातील सर्व विभागप्रमुख व मतदारसंघाच्या अध्यक्षांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांचा पराभव झाल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपविला. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी आता इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यात अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी काहींनी पक्षश्रेष्ठींच्या दरबारात हजेरी लावून वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे नवा-जुना असा वाद सुरू झाला असून, यासंदर्भात शहरातील सहा विभागीय अध्यक्ष व तीन मतदारसंघांच्या अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना पत्र पाठवून जर शहराध्यक्ष शरद कोशिरे यांचा राजीनामा मंजूर करून नवीन नियुक्ती करणार असाल तर पक्ष स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असणार्या व कार्यरत असलेल्या पदाधिकार्यांमधूनच सदरची नियुक्ती केली जावी. इतर पक्षातून आलेल्या व पक्ष संघटनेत कुठलेही काम न केलेल्यांना शहराध्यक्षपदी नेमू नये. तसे केल्यास कार्यकर्ते सामूहिक राजीनामा देतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीतही पराभवाला सामोरे जावे लागू नये म्हणून पक्षाने ही बाब लक्षात घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. या पत्रावर संजय खैरनार, शेख सलीमराज, मकरंद सोमवंशी, अशोक मोगल, देवांग जानी, बाळासाहेब जाधव, यादवराव पाटील, किशोर शिरसाठ व मनोहर कोरडे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. (प्रतिनिधी)