शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

‘त्या’ गावांना पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:56 AM

दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

नाशिक : दुष्काळी गावांना पाणीदार बनविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार आणिकोनांबे या गावांमध्ये श्रमदानाने मोठे काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्व निकषांवर स्पर्धेत टिकलेल्या या गावांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामस्थांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करून दुष्काळमुक्त होण्याचा संकल्प केला आहे. श्रमदानातून घाम गाळणाºया गावकºयांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत. या गावांना पाणीदार बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची चळवळ आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटना यांनी सुरू केली आहे. महाराष्टÑ शासनाच्या जलयुक्त शिवाराचे सहकार्यही त्यांना लाभत आहे. सिन्नर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र वडझिरे, धोंडबार आणि कोनांबे हिच गावे स्पर्धेत टिकली आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनीदेखील या मोहिमेत सहभाग घेतला होता. पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यापक सहयोगातून या तीनही गावांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे मोठे काम झाले आहे. नदी, ओढ्यातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, मातीबांध, दगडीबांध बांधण्याची किमया ग्रामस्थांनी करून दाखविली आहे. मात्र यंदा जुलै उजाडूनही पुरेसा आणि समाधानकारक पाऊस नसल्याने ग्रामस्थांना चिंता लागली आहे. पावसाच्या आगमनावरच या गावांचे भवितव्य आणि गावकºयांच्या श्रमाचे मोल अवलंबून आहे.

टॅग्स :WaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा