शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 19:00 IST

शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

ठळक मुद्देशालार्थ आयडीसाठी शिक्षकांची अडवणूक शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी कायम स्वरुपी अधिकारी नेमण्याची शिक्षक संघटनांची मागणी

नाशिक :शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक अशी दोन पदे एकाच अधिकाºयाकडे असल्याने शिक्षकांची दुहेरी अडचण होत असून, शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकपदी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागात शालार्थ आयडीच्या सुमारे २ हजार २०० फाईली पेंडिंग होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात आंदोलने, मोर्चे काढत त्यांची संख्या साडेचारशेवर आणली आहे. मात्र, नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या फाईली मार्गी लावायला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने अधिकाºयांच्या कारभाराविषयी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून संशय घेतला जात आहे. या स्थितीत शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी कार्यालय, वेतन पथकाच्या कार्यालयाजवळ मध्यस्थांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद अजूनही रिक्त असून, या पदाचा कार्यभार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची बढती झाल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार उदय देवरे यांच्याकडे आहे. या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी असल्याने शिक्षकांना त्यांच्या समस्यांविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपसंचालकांची करावी लागते प्रतीक्षा नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांतून शिक्षक त्यांच्या समस्या घेऊन येतात. मात्र, उपसंचालक भेटत नसल्याने शिक्षकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर शिक्षिकांसोबत लहान बाळेही सोबत असल्याने त्यांची हेळसांड होताना दिसते. शिवाय नाशिकपर्यंत येण्या-जाण्याचा खर्च करूनही अनेकदा उपसंचालकांची भेट होत नसल्याने शिक्षकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची तक्रार शिक्षकांमधून दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा