शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पाच महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:19 IST

सायखेडा : कवडीमोल भावात कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकदेखील काढले. शेतकऱ्यांकडून योग्य ती सर्व कागदपत्रेही जमा करून घेतली. या सर्व प्रक्रियेला पाच महिने उलटून गेली तरी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : कांदाच्या कवडीमोल भावाने बळीराजा अजूनही हवालदिलच

सायखेडा : कवडीमोल भावात कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकदेखील काढले. शेतकऱ्यांकडून योग्य ती सर्व कागदपत्रेही जमा करून घेतली. या सर्व प्रक्रियेला पाच महिने उलटून गेली तरी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. खरिपाच्या पूर्वतयारीसाठी त्वरित अनुदानाची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असतो. हंगामाच्या सुरुवातीपासून भाव गडगडले होते. डिसेंबर महिन्यापासून कांदा अवघा २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी किमान एक हजार रु पये खर्च येतो, बियाणे, खते, मशागत, औषधे, लागवड, खुरपणी, काढणी असा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे कांदा किमान एक ते दीड हजार रुपयांनी विकला गेला तर किमान खर्च वसूल होतो. कांद्याला हमीभाव द्यावा यासाठी जानेवारी महिन्यात अनेक आंदोलने झाली. अनेक बाजारपेठा बेमुदत बंद करण्यात आल्या होत्या. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाने आठ आमदार व मंत्रिमहोदयांचे शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पाठविले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.त्यानुसार बाजार समित्यांमार्फत शेतकºयांकडून सातबारा उतारा, कांदा विक्र ी पावती, बँक पासबुक, आधार कार्ड अशी माहिती संकलित करण्यात आली.अद्यापपर्यंत केवळ ३१ डिसेंबरपर्यंतचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहे. त्यानंतरचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विकला गेलेल्या कांद्याचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने मागे-पुढे होईल, असे शेटकºयांना वाटत होते. आता नवीन सरकार आले तरी अजून अनुदान खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे चालू खरीप हंगामातील पिकांसाठी भांडवल कसे उभे करावे, खते, बी-बियाणे, मशागत यासाठी भांडवल कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा अनुदान तत्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.बाजार समितीकडून कागदपत्रांचे संकलनजानेवारी महिन्यापर्यंत सर्व माहिती जमा करून शासनास सादर करण्यात आली. यानंतरही अनुदान कालावधीला मुदतवाढ देऊन फेब्रुवारीपर्यंत माहिती संकलन केली. बाजार समितीच्या माध्यमातून कागदपत्रे घेऊन आज चार महिने पूर्ण झाली आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान कांदा कवडीमोल भावात विकला गेल्याने शेतकºयांचा खर्चदेखील वसूल झाला नाही. शेतकरी अडचणीत आले असल्याने त्यांना आधार देण्यासाठी सरकारमार्फत प्रतिक्विंटल २०० रु . अनुदान देण्याची घोषणा केली गेली. डिसेंबर महिन्याचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र त्या पुढील तीन महिन्यांचे कागदपत्रे जमा करून चार महिने उलटले तरी अनुदान जमा होत नाही. अनुदान जमा करून शेतकºयांना दिलासा द्यावा.- गोकुळ गिते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती.