शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

पाच महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:19 IST

सायखेडा : कवडीमोल भावात कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकदेखील काढले. शेतकऱ्यांकडून योग्य ती सर्व कागदपत्रेही जमा करून घेतली. या सर्व प्रक्रियेला पाच महिने उलटून गेली तरी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : कांदाच्या कवडीमोल भावाने बळीराजा अजूनही हवालदिलच

सायखेडा : कवडीमोल भावात कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकदेखील काढले. शेतकऱ्यांकडून योग्य ती सर्व कागदपत्रेही जमा करून घेतली. या सर्व प्रक्रियेला पाच महिने उलटून गेली तरी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. खरिपाच्या पूर्वतयारीसाठी त्वरित अनुदानाची रक्कम मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असतो. हंगामाच्या सुरुवातीपासून भाव गडगडले होते. डिसेंबर महिन्यापासून कांदा अवघा २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी किमान एक हजार रु पये खर्च येतो, बियाणे, खते, मशागत, औषधे, लागवड, खुरपणी, काढणी असा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे कांदा किमान एक ते दीड हजार रुपयांनी विकला गेला तर किमान खर्च वसूल होतो. कांद्याला हमीभाव द्यावा यासाठी जानेवारी महिन्यात अनेक आंदोलने झाली. अनेक बाजारपेठा बेमुदत बंद करण्यात आल्या होत्या. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाने आठ आमदार व मंत्रिमहोदयांचे शिष्टमंडळ दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पाठविले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.त्यानुसार बाजार समित्यांमार्फत शेतकºयांकडून सातबारा उतारा, कांदा विक्र ी पावती, बँक पासबुक, आधार कार्ड अशी माहिती संकलित करण्यात आली.अद्यापपर्यंत केवळ ३१ डिसेंबरपर्यंतचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहे. त्यानंतरचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विकला गेलेल्या कांद्याचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्याने मागे-पुढे होईल, असे शेटकºयांना वाटत होते. आता नवीन सरकार आले तरी अजून अनुदान खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे चालू खरीप हंगामातील पिकांसाठी भांडवल कसे उभे करावे, खते, बी-बियाणे, मशागत यासाठी भांडवल कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा अनुदान तत्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.बाजार समितीकडून कागदपत्रांचे संकलनजानेवारी महिन्यापर्यंत सर्व माहिती जमा करून शासनास सादर करण्यात आली. यानंतरही अनुदान कालावधीला मुदतवाढ देऊन फेब्रुवारीपर्यंत माहिती संकलन केली. बाजार समितीच्या माध्यमातून कागदपत्रे घेऊन आज चार महिने पूर्ण झाली आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान कांदा कवडीमोल भावात विकला गेल्याने शेतकºयांचा खर्चदेखील वसूल झाला नाही. शेतकरी अडचणीत आले असल्याने त्यांना आधार देण्यासाठी सरकारमार्फत प्रतिक्विंटल २०० रु . अनुदान देण्याची घोषणा केली गेली. डिसेंबर महिन्याचे अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र त्या पुढील तीन महिन्यांचे कागदपत्रे जमा करून चार महिने उलटले तरी अनुदान जमा होत नाही. अनुदान जमा करून शेतकºयांना दिलासा द्यावा.- गोकुळ गिते, संचालक, पिंपळगाव बाजार समिती.