शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 01:07 IST

राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण सेतू अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचायला जुलै उजाडणार असल्याने तोपर्यंत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक वर्ष सुरू : जुलैमध्ये पोहोचणार शैक्षणिक साहित्य

नाशिक : राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण सेतू अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचायला जुलै उजाडणार असल्याने तोपर्यंत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अभियानांतर्गत गावागावात पालक समित्या स्थापन करून आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यभरात सुमारे ९९५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळास्तरावरील समिती प्रत्यक्ष गावपाड्यावर जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहे. प्रकल्प स्तरावरील समिती नियोजनाचे काम करणार आहे, तर आयुक्त स्तरावरील समिती अंमलबजावणीबाबतचे काम पाहणार आहे. आदिवासी भागात अनेक पालकांकडे मोबाइल फाेन नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर जाऊ नये यासाठी शिक्षण सेतू अभियानांतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने आदिवासी विभागाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक कामकाज सुरू केले असले तरी जेथे शक्य आहे त्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. दुर्गम, आदिवासी भागातील विद्यर्थ्यांना मात्र शैक्षणिक साहित्य मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. अद्याप शैक्षणिक साहित्याची छपाईच झालेली नसल्याने ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान जुलै महिना उजाडेल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चौकट-

राज्यातील शाळा आणि स्थापन समित्या

शिक्षण सेतू अभियानांतर्गत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित, एकलव्य आश्रमशाळांमध्ये अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक विभागात एकूण ४८७ शाळा असून, ४३५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठाणे विभागात २३३ शाळा आणि २०१ समित्या, नागपूर विभागात २६३ शाळा असून, २३० तर अमरावती विभागात २०४ शाळांसाठी १२८ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणSchoolशाळा