शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 4:31 PM

येवला तालुका : उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या पाण्याने समाधान

ठळक मुद्देयेत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : बहुप्रतिक्षीत अशा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत येऊन ठेपले आहे तर येत्या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पाणी जाऊन पोहोचणार असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. सतत दुष्काळाचा शाप असलेल्या तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या मांजरपाडयाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरलेला आहे. यावर्षी मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत येऊन पोहोचल्याने तालुुक्याच्या उत्तरभागातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. येत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन भुजबळ मंत्रिपदी विराजमान झाल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या या प्रकल्पाबाबत आशा उंचावल्या आहेत. येवला तालुक्यातील कातरणी,विसापूर, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी ,गुजरखेडे, बाळापूर, साबरवाडी खैरगव्हान तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह परीसरातील गावामध्ये ार्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तर पेरणीयोग्य पाऊसही झालेला नव्हता त्यामुळे शेतकरीवर्गाचा जीव टांगणीला लागेलला असतानाच मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने परीसरातील जमिनीची भूक भागल्याने विहिरींना पाणी उतरले. या पाण्याच्या भरवशावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा, मका, कपाशी, मेथी यासह इतर नगदी पिकाचे नियोजन केले.शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता मात्रया वर्षी विहिरींना पाणी चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. बेभरवशाचे असलेले कांदापीक या वर्षी मात्र शेतक-यांना लखपती करून गेले. कधी नव्हे तो कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचीही लागवड सुरू असून उन्हाळ कांद्यालाही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकºयांसोबतच मजूर वर्गही खुश असून मजुरीचे दरही वाढल्याने मजुरांच्या हातात चार पैसे जास्तीचे येऊ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी