शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

खड्डेयुक्त रस्ते घेतोत लालपरीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:30 PM

देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे.

पेठ : देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त्यानंतरच्या काळात देखभाल व दुरुस्ती अभावी या रस्त्यांची दयनिय झाल्याने सद्य:स्थितीत तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. यात वाहनांचा प्रथम बळी जात आहे.स्थळ - पाहूची बारी रस्ता ( फोटो -08 सप्टेंबरपेठ 03)पेठहून सायंकाळी सुटणारी पेठ-पाहूची बारी ही शेवटची लांब पल्ल्याची बस. सर्व खासगी वाहने निघून गेल्यावर अंबापूर, कोपुर्ली, खिरकडे, तिर्ढ, जोगमोडी, माळेगाव, म्हसगण, आंबे यासह २० ते २५ गावांसाठी ही शेवटची बस. थांब्यांची संख्या जास्त असल्याने कधी कधी पाहूची बारीला पोहोचायला या बसला रात्री १० वाजतात. त्यातच काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास जागमोडी जवळ ही बस पंक्चर झाल्याने अंधारात प्रवाशांना ताटकळून रहावे लागले. गाडीत अनेक महिला व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने तासन् तास खोळंबा होत असल्याने याचे सर्व खापर खड्डेयुक्त रस्त्यांवर येऊन फुटते. अनेक प्रवाशांना मुख्य रस्त्यावर उतरून चार ते पाच किमी पायी जावे लागते.गाडीत बसा... पण नाशिक पोहोचेलच असे नाहीमहाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तर अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे रु ंदीकरण सुरू असताना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनधारकांना खड्डे व गाळातून कसरत करत मार्गक्र मण करण्याची वेळ आली आहे. याचाही सर्वाधिक त्रास लालपरीलाच सहन करावा लागत आहे. पेठ आगारातून सुटणारी नाशिक बस नाशिकला पोहोचेल की नाही याची धास्ती प्रवाशांना असते. पेठ ते नाशिक या ५५ किमी अंतरात दररोज दोन तरी बसेस नादुरु स्त होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात. म्हणजे बसमध्ये बसा, तिकिटाचे पैसेही द्या मात्र तुम्ही नाशिकला पोहोचालच याची खात्री नाही. त्यातच बºयाच ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये खटके उडण्याचे प्रसंग घडत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकstate transportराज्य परीवहन महामंडळ