शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वयोवृद्ध शेतकऱ्याची कमाल; १५ महिन्यात दीड एकरातून घेतले १७ लाखांचे विक्रमी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:19 PM

यशकथा : एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थाच्या वार्षिक वेतनापेक्षा अधिक उत्पन्न केवळ ५७ आर क्षेत्रातून मिळविले

- संजय दुनबळे ( नाशिक ) 

एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदस्थाच्या वार्षिक वेतनापेक्षा अधिक उत्पन्न केवळ ५७ आर क्षेत्रातून मिळविता येऊ शकते, हे सिद्ध केले आहे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खर्डे येथील मन्साराम वामन देवरे या वयोवृद्ध शेतकऱ्याने. एकाच वेळी तीन पिके घेऊन १५ महिन्यांमध्ये देवरे यांनी तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. तीनही पिकांना मिळून त्यांना एकूण एक लाख ५० हजारांचा खर्च आला.  

देवळा तालुक्यातील खर्डे येथे मन्साराम देवरे यांची केवळ ५७ आर इतकी शेतजमीन आहे. दरवर्षी शेतात नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित आहेत. यावर्षी मन्साराम देवरे यांनी आपल्या  क्षेत्रात लाल कांदा, उन्हाळ कांदा आणि पपईचे उत्पन्न घेऊन चांगले उत्पन्न मिळविले आहे. सुरुवातीला त्यांनी शेतात तब्बल पाच ट्रक शेणखत टाकले. त्यानंतर जमिनीची मशागत करून प्रथम लाल कांद्याची लागवड केली. कांदा लागवडीनंतर त्यांनी त्याच क्षेत्रात पपई लागवडीचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कामास सुरुवात केली.

निफाड तालुक्यातील उगाव येथील नर्सरीतून त्यांनी तैवान ७८६ वाणाची पपईची रोपे आणली. पपईचे एक रोप त्यांना १० रुपयांना घरपोहोच मिळाले. वाफ्यांच्या वरंबीवर सात बाय सातच्या अंतरावर त्यांनी १३०० रोपांची लागवड केली. पपईची झाडे असल्यामुळे त्यांना कांदा पिकात तणनाशक मारता येत नव्हते त्यामुळे तीन वेळा कांद्याची निंदणी करावी लागली. यासाठी त्यांना ४० हजार रुपयांचा खर्च आला. तीन ते साडेतीन महिन्यांत लाल कांद्याचे पीक निघून गेले. लाल कांद्याचे २५० क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. या कांद्याला त्यावेळी १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लाल कांदा काढल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच जमिनीत उन्हाळ कांद्याची लागवड केली. तोपर्यंत पपईची झाडे मोठी होत होती. उन्हाळ कांद्याचेही त्यांना २५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्यालाही चांगला भाव मिळाला. दोन्ही कांदे निघेपर्यंत ७-८ महिन्यांचा काळ निघून गेला. या काळात पपईच्या झाडांची चांगली वाढ झाली.

उन्हाळ कांदा निघाल्यानंतर पपईला फळधारणा झाली. लागवडीनंतर नवव्या महिन्यापासून त्यांना पपईचे उत्पादन सुरू झाले. ते पुढे सहा महिने चालले. पपईचे त्यांना ४० ते ४५ टन उत्पादन झाले. ते त्यांनी व्यापाऱ्याला १२ ते १३ रुपये किलोने जागेवर विकले. पपईचा हंगाम संपत आल्यानंतर त्यांनी पपईच्या झाडांचा चीक काढण्याचा सौदा व्यापाऱ्याला दिला. चिकापोटी त्यांना १ लाख २५ हजार रुपये मिळाले. तीनही पिकांतून देवरे यांना १५ महिन्यांत खर्च वजा जाता १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आता पपईचा हंगाम संपला असून, झाडांचा चीक काढल्याने ती वाळू लागली आहेत. आता झाडांवर रोटरी मारून त्याचेच ते पुढील पिकासाठी खत करणार आहेत. पाण्यासाठी त्यांच्याकडे बोअर आहे. पाणी कमी पडल्यास त्यांच्याकडे १० हजार लिटरचा टॅँकर असून, गावातून पाणी आणून ते पीक जगवितात, असे देवरे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी