शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

वातावरण बदलामुळे द्राक्षबागांवर किटकांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:22 AM

परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यावर्षी अल्प राहिल्याने द्राक्षांना पुरेसे पाणी मिळणेही अवघड झाले आहे. एकूणच द्राक्ष बागायतदार वातावरण बदलाच्या या दुष्परिणामामुळे संकटात सापडल्याचे चित्र आहे.नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जात असल्याने वायनरींची संख्याही वाढली आहे. येथील वाइन, द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ आली आहे. वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले. द्राक्षाचा मणी तयार होत असताना वातावरण बदल, मुबलक पाण्याच्या अभावामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. हिरवे तुडतुडे, अळीचे प्रमाण अधिक झाल्याने किटकनाशक फवारणी अधिक प्रमाणात शेतकºयांना करावी लागत आहे. जमिनीमध्ये पाण्याची पातळी घटल्याने द्राक्षांच्या घडाचा आकारही कमी राहत आहे. द्राक्षबागांमधील झाडांवर फळधारणाही कमी-जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.पावसाची हुलकावणीसप्टेंबर छाटणी शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर केली; मात्र त्यानंतर पाऊस झाला नाही, परिणामी द्राक्ष उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. जानेवारीमध्ये या छाटणीचा माल बाजारात येईल त्यावेळी आवक जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी द्राक्षबागांमध्ये उत्पादनाच्या तफावतीमुळे त्याचा परिणाम आवकेवर निश्चित स्वरूपात होईल.

टॅग्स :TemperatureतापमानagricultureशेतीNashikनाशिक