शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

भाज्या स्वस्त तरीही किरकोळ विक्री महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:34 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता

पंचवटी : गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने सर्व प्रकारच्या फळ व पालेभाज्या महागल्या होत्या. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत होता. मात्र आता फळभाज्यांची आवक वाढून बाजारभाव स्वस्त झाले असतानादेखील आठवडे बाजार व हातगाड्यांवर सर्वसामान्य ग्राहकांची लूटमार सुरू केली जात आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भेंडी, टोमॅटो, दोडका, भोपळा, गिलका, ढोबळी, मिरची यांना प्रति किलोमागे जो बाजारभाव मिळतो त्या बाजारभावाच्या दीडपट दराने काही हातगाडीधारक तसेच आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रेते विक्री करीत आहेत. हिरवी मिरची प्रतिकिलोसाठी किमान ४० रुपये दर असला तरी हातगाडीवर हिरवी मिरची ८० रुपये अन्य फळभाज्या २० रुपये किलो असताना ६० रुपये या दराने विक्री करीत आहे. विशेषत: उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या भागात रोजच फळभाज्या व पालेभाज्याचे बाजारभाव बदलतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला ३३० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाल्यानंतर हातगाडीवर भाजीपाला विक्री करणाºया विक्रेत्यांची चंगळच झाली आहे. पूर्वी दोन ते तीन रुपयांना कोथिंबीरच्या काड्या दिल्या जात, मात्र आता तर किमान दहा रुपये कोथिंबिरीसाठी मोजावे लागत आहे. नागरी वसाहतीचा दर्जा जसा त्यानुसार बाजारभाव बदलू लागले आहेत.कोथिंबीर २० रुपये जुडीदोन आठवड्यापूर्वी एका शेतकºयाच्या कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात कोथिंबीरीचे भाव वाढविण्यात आले. पाच, दहा रुपयाला कोथिंबीरीच्या दोन चार काड्याच दिल्या जातात. बाजारात आता कोथिंबीर २० ते २५ रुपये जुडी मिळत असताना भरेकऱ्यांकडे मात्र अजूनही कोथिंबीरीचे भाव चढेच आहे.नाशिक बाजार समितीत दररोज सकाळी फळ व पालेभाज्यांची विक्री केली जाते. मात्र या ठिकाणचे बाजारभाव, हातगाड्या व आठवडे बाजारातील बाजारभाव किंवा रस्त्यावर रोजच विनापरवाना भरणाºया भाजीबाजारातील बाजारभाव यामध्ये भाजीपाला दरात मोठी तफावत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारFarmerशेतकरीconsumerग्राहक