शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेचे : गणेशशास्त्री द्रविड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 01:54 IST

दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील पंडितराज गणेशशास्त्री द्रविड गुरुजी यांनी केले.

ठळक मुद्देगौरीशंकर राष्ट्रीय वेद पुरस्काराचे वितरण

पंचवटी : दान, क्रोध, श्रद्धा व सत्य याचे लहानपणापासून शिक्षण दिले तर वेदांची परंपरा टिकून राहील. वैदिकांबद्दल श्रद्धा बाळगायला हवी. कोणत्याही प्रकारचे कर्म करताना वेदांचा संबंध येतोच. आज वेदांची परंपरा लुप्त होत चालली असून, भविष्यात वेदांचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील पंडितराज गणेशशास्त्री द्रविड गुरुजी यांनी केले.

सरदार चौकातील शंकराचार्य मठात महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्यावतीने कोरोना महामारी संकट दूर व्हावे, यासाठी वेद पाठशाळेने त्र्यंबकेश्वर, सिद्धिविनायक, विठ्ठल रूक्मिणी मंदिर, पंढरपूर याठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत चार वेदांचे वैदिक विद्वान बोलावून पारायण केले. त्याची सांगता म्हणून वेदपठण व भारतातील श्रेष्ठ वैदिक चारही वेदांच्या विद्वानांचा गणेशशास्त्री यांच्या हस्ते स्व. धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेद पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गणेशशास्त्री म्हणाले की, ब्रह्म म्हणजे वेद होय. ब्राह्मणांनी व्यवस्थित अध्ययन केले नाही, तर समस्या निर्माण होतात. वैदिकांचा पाठ बरोबर आहे. त्याचे लेखन करणे गरजेचे आहे. सर्व जण वेद शिकत नाहीत; परंतु प्रत्येकाला वेदाची गरज आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

जोपर्यंत ब्रह्म आहे तोपर्यंत वेदवाणी आहे. सामवेद, यजुर्वेद नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते; परंतु ते नष्ट झाले नाहीत. तोंड, डोळे, कान हे वेदांचे अंग असून, ते टिकले तरच वेद टिकतील, असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना वेदाचार्य दिनकर भट्टा फडके यांनी केले.

यावेळी ऋग्वेद वेदाचार्य दिनकर फडके, यजुर्वेद वेदाचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, सामवेद वेदाचार्य कृष्ण पळसकर, अथर्ववेद वेदाचार्य श्रीधर अडी गोकर्ण यांना शाल व श्रीफळ महावस्त्र व स्मृतिचिन्ह देऊन स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदमूर्ती रवींद्र पैठण यांनी केले. यावेळी वेद पारायणाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला सतीश शुक्ल, रामगोपाल अय्यर, वैभव मांडे, श्याम भटमुळे, वासुदेव ठोसर, मुकुंदाचार्य, विनय त्रिपाठी, उपस्थित होते.

 

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम