शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वसंतदादा पाटील विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व - मधुकर भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:26 IST

स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात रूढ केलेले आर्थिक गणित आज तंतोतंत लागू पडते. त्यातून त्यांचा सामाजिक व संवेदनशील दृष्टिकोन तर दिसून येतोच, पण भविष्याचा त्यांनी त्याकाळी घेतलेला आढावाही अधोरेखित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

नाशिक : स्व. वसंतदादा पाटील म्हणजे विलक्षण दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी त्याकाळी केलेले प्रयत्न लाखमोलाचे होते. अशी महाविद्यालये चालविण्यासाठी त्यांनी त्याकाळात रूढ केलेले आर्थिक गणित आज तंतोतंत लागू पडते. त्यातून त्यांचा सामाजिक व संवेदनशील दृष्टिकोन तर दिसून येतोच, पण भविष्याचा त्यांनी त्याकाळी घेतलेला आढावाही अधोरेखित होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.  सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय सप्ताहाअंतर्गत आयोजित अनंत कान्हेरे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि. ८) झालेल्या कार्यक्रमात बोलताना भावे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणात न मिळणारी संधी लक्षात घेऊन त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून महाराष्टÑात ग्रामीण भागात जागोजागी महाविद्यालयांची स्थापना केली. त्याकाळी या महाविद्यालयांचा आर्थिक डोलारा सांभाळण्याचे गणित त्यांनी दूरदृष्टीने मांडले होते. १०० पटसंख्या असलेल्या एखाद्या महाविद्यालयातील केवळ २० आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांकडून फी घेऊन उर्वरित ८० विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे असे सूत्र त्यांनी दिले. त्याकाळी ग्रामीण भागातून शिकलेले विद्यार्थी आज जगभर ठिकठिकाणी उत्तम सेवा देत देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत व हीच दादांच्या कार्याला मिळालेली पावती असल्याचे त्यांनी सांगितले.  याप्रसंगी सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, यशवंत हापे, नानासाहेब पाटील, श्रीकांत बेणी, नानासाहेब बोरस्ते, अ‍ॅड. अभिजित बगदे, प्रा. यशवंत पाटील, प्रा. सी. आर. पाटील, संजय करंजकर आदी उपस्थित होते. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रांत दादांनी केलेले काम विलक्षण होते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता अफाट होती. अडथळ्यांवर मात करण्याची हातोटी कौतुकास्पद होती. सर्वसामान्यांचे ते कैवारी म्हणूनच अखेरपर्यंत कार्यरत होते. हे गुण आजच्या पिढीत येणे गरजेचे आहे, असेही मधुकर भावे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकlibraryवाचनालय