शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:06 AM

तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

नाशिक : तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.कुसुमाग्रस स्मारकातील विशाखा सभागृहात सोमवारी (दि.१६) संवाद संस्थेतर्फे ‘वसंत बापट कवी व कविता’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. पी. एस. पवार व संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. बाळासाहेब गुंजाळ म्हणाले, वसंत बापट यांच्या काव्य रचना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या असून, त्यांनी ज्याप्रमाणे प्रेम कविता व निसर्ग कविता केल्या तितक्याच सहजतेने बालक विताही केल्या. त्यांची ‘फुंकर’सारखी असफल प्रितीची कविता प्रसंगातील नाट्य काव्यशैलीत टिपण्याचे क ौशल्य शिकवून जाणारी आहे, तर दुष्काळासाख्या बिकट स्थितीविषयी उदासीन असलेल्या शासकीय यंत्रणेवर कोरडे ओढणाऱ्या उपरोधात्मक कविताही प्रभावशाली असल्याचे गुंजाळ म्हणाले. वसंत बापट यांच्या ‘बिजली’ या काव्यसंग्रहासह सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, लावणी अणि लावणी शैलीतीलकविता कधी धीटपणे तर कधी हळुवार भावना व्यक्त करणाºया असल्याचे सांगतानाच बापट यांच्या कवितांविषयी गुंजाळ यांनी विविधांगी पैलू उपस्थिताना उलगडून सांगितले. प्रास्तविक डॉ. किरण पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले, तर आभार ज्योती फड यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकliteratureसाहित्य