शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच दिवसांपासून शहरात  वरुणराजाची कृपादृष्टी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:38 IST

पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.

नाशिक : पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.  मागील वर्षी जुलैच्या उत्तरार्धात पावसाची हजेरी समाधानकारक राहिली होती; मात्र यंदा त्या तुलनेत वरुणराजाने कृपादृष्टी कमी केली. या हंगामात अद्याप गंगापूर धरणातून उच्चांकी ९ हजार क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहताना नाशिककरांनी बघितली.  रविवारी (दि.२९) इगतपुरी, दारणा धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात शुन्य मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच गंगापूर, काश्यपी, गौतमी धरण समुहाच्या क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याची नोंद जलसंपदाविभागाकडे नाही. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार २७४ दलघफू इतका असून धरण ७५.९१ टक्के भरले आहे. सध्या गंगापूरमधून ६३२ क्युसेस इतका विसर्ग गोदापात्रात होत आहे. तसेच काश्यपी धरणामधील पाण्याची पातळी १ हजार ५६८ दलघफूपर्यंत पोहचली असून धरण ८४.६६ टक्के भरले आहे. तसेच गौतमी धरणाचा जलसाठा १ हजार ३२६ दलघफू इतकी झाली आहे. धरणसाठा ८४.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. या दोन्ही धरणातून काही प्रमाणात गंगापूर धरणक्षेत्रात पाण्याची आवक सुरू आहे. दारणा धरण८४.८८ टक्के भरले असून भावली १०० टक्के भरले आहे.जुलै महिन्यातील पावसाचा उच्चांकयावर्षी १६ तारखेच्या सकाळी साडेआठ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ५६ मि.मी इतका पावसाचा उच्चांक हवामान केंद्राकडून नोंदविला गेला. गेल्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यात १४ तारखेला सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ७१.६ मि.मी इतका पाऊस झाल्याची नोंद केंद्राकडे आहे. एकूणच या आकडेवारीवरुन यावर्षी जुलै महिन्यातील पर्जन्यमान घसरल्याचे दिसते.खड्डे बुजविण्याबाबत उदासीनतापावसाने उघडीप देऊन पाच दिवस उलटले असले तरी अद्याप महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शहर व उपनगरांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त लागलेला नाही. पावसाने उघडीप दिल्याची संधी साधून युध्दपातळीवर चांगल्याप्रकारे मुरूम, कचचा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस