शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

दापूर परिसरात अवकाळी पावसाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:26 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे ...

ठळक मुद्देगारांचा खच : पिकांचे मोठे नुकसान ; वीज पडून गाय ठार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर व दोडी परिसरात रविवारी (दि.२१) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. सुमारे दीड तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली होती. तसेच पहाटेच्या वेळी गारठा असल्याने समिश्र वातावरणाचा अनुभव परिसरात येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिके काढणीसाठी लगबग सुरु केली होती. दापूर परिसरात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मेघ गर्जना व विजांचा कडकडाटांसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसात गारपिटीने हजेरी लावली. अनेक भागांत शेतातील पिकांमध्ये पाणी साचले होते. रब्बी हंगामातील काढणीस आलेले गहू, हरबरा, ज्वारी, बाजरी, भेंडी, टमाटा, मिरची तसेच कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दापूर भागात वारा व पावसाने गहू व बाजरीचे पिके भुईसपाट झाले आहे.दोडी, दापूर, गोंदे, चापडगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, खंबाळे आदी भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. दापूर येथील दत्तू आव्हाड, भाऊसाहेब साबळे, बंडू पालवे, दत्तू आव्हाड, संदीप आव्हाड, संपत काटुळे, दत्ता सोनवणे आदींसह अन्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.वीज पडून गाय ठारतालुक्यातील गोंदे शिवारात विजांच्या कडकडाट व पावसाने हजेरी लावली. या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. मनेगाव रस्त्यालगत बिरोबा वस्तीकडे राहणारे शेतकरी शंकर कारभारी शिंदे यांनी गोठ्यात बांधलेल्या गायीवर वीज पडल्याने जागेवर तिचा मृत्यू झाला.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दापूर व गोंदे परिसरात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिके वाया गेल्याने बळीराजाच्या पदरी पुन्हा निराशाच पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांशी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरपाई देण्यात यावी.- दत्तात्रय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य, गोंदे.

(२१ दापूर, १, २)

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस