शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

बेमोसमी पावसाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:40 PM

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.

सायखेडा : दोन दिवसांपासून जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गोदाकाठ भागामध्ये सुमारे तासभर पाऊस झाला.कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याची संकटांनी यंदाही पाठ सोडलेली नाही. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने जेरीस आणले आहे. दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस कोसळत असतानाच द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतकऱ्यांच्या अनेक बागा दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेत आहे. दोडा आणि फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये असणाऱ्या बागांना पाणी जास्त झाल्यास त्याची गळ आणि कूज होते. ढगाळ हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसतो. गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागांना पुरेसे ऊन मिळत नाही. त्यामुळे भागांची गळ, कूच होऊ लागली आहे निफाड तालुक्यातील ३५ टक्के द्राक्षबागा गळीने खराब झाल्या आहेत. यामुळे द्राक्ष पंढरीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे यंदा रोपांचा तुटवडा झालेला कांद्याच्या लागवडी घट झाली आहे लागवड केलेला कांदा पुन्हा पावसात सापडल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याचे उत्पादनात घट होणार आहे. पहाटे झालेल्या पावसात शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबले. कांद्याचे वाफे, द्राक्ष बागाच्या गल्ल्या आणि भाजीपाला या ठिकाणी पाणी तुंबल्याने सर्वच पिकांची नासाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारांचा फटका, बेभावात विकणारा शेतमाल यामुळे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जबाजारी होत चालला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्व पिके शेतामध्ये बहरलेला असतानाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून टाकले.

टॅग्स :Nashikनाशिक