त्र्यंबक तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान
By Admin | Updated: May 29, 2014 01:05 IST2014-05-28T23:30:16+5:302014-05-29T01:05:20+5:30
त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने दुसर्या दिवशीही हजेरी लावली. तथापि, वादळाने मात्र घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

त्र्यंबक तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान
त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने दुसर्या दिवशीही हजेरी लावली. तथापि, वादळाने मात्र घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
त्र्यंबक तालुक्यात आजही अवकाळी पाऊस पडल्याने जातेगाव (हरसूल), रोहिले, देवगाव, हीपाडा, डहाळेवाडी आदि अनेक भागांत पत्रे, कौले उडाली आहेत.
दरम्यान, त्र्यंबक येथील मंदिराचे काम करीत असलेल्या कारागीर व मजुराचा वीज पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना तातडीने दीड लाख रुपये मदतीचे धनादेश देण्याबाबत तहसीलदार नरेश बहिरम यांनी पुढील कार्यवाही केली आहे. मयत जगन शिंदे यांच्या पत्नीदेखील विजेचा धक्का बसून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर धनादेश प्रदान करण्यात येईल. तसेच दुसरा मयत सेवाराम वाघाराम राजपूत हा राजस्थानचा असल्याने त्याच्या वारसांनाही मदत देण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. तसेच दगावलेल्या जनावरे मालकांनादेखील मदत देण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी (दि. २९) मदतीचे धनादेश देण्यात येणार असल्याचे समजते. (वार्ताहर)