शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:33 AM

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्दे सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार असून, या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या सरकारच्या या फसवणुकीविरोधात व वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून व काळ्या रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकर्त्यांनीही काळ्या रंगाच्या साड्यांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चारचाकी वाहन ओढून व दुचाकीची अंत्ययात्रा काढून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला. यावेळी चार वर्षांत मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणे या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे.