शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-दुचाकी दुर्घटनेत दोन जिवलग मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:05 IST

सटाणा : वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (२१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, खमताणे ता. बागलाण) या दोघा युवकांचा दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देमॉडर्न पिकअप सेंटरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

सटाणा : वाढदिवसाच्या आनंदाच्या दिवशीच शहरातील पिंपळेश्वर रोडवरील जयेश नितीन अहिरे (२१) आणि त्याचा मित्र विशाल संजय इंगळे (२२, खमताणे ता. बागलाण) या दोघा युवकांचा दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर शिवारातील सटाणा-देवळा रस्त्यावर शुक्रवार २२ रोजी रात्री आठ वाजता मॉडर्न पिकअप सेंटरजवळ ही दुर्दैवी घटना घडली.शुक्रवारी (दि. २२) जयेश नितीन अहिरे या युवकाचा वाढदिवस असल्याने देवळा येथील मित्राने त्याला केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी देवळ्याला बोलावले होते. त्यामुळे रात्री आठ वाजता खमताणे येथील विशाल संजय इंगळे या मित्राला सोबत घेऊन जयेश दुचाकीवर (क्रमांक एम. एच. ४१, ए. एल. ९०९६) देवळ्याच्या दिशेने निघाला होता. शहरापासून काही अंतरावर साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मॉडर्न पिकअप सेंटरलगत पुढे जाणार्‍या ट्रॅक्टरचा (क्रमांक एम. एच.१५, ए. एम. १५८०) अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवरील जयेश आणि विशाल हे दोन्ही युवक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले.रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहतूक सुरु होती. एका बसचालकाला दिव्यांच्या प्रकाशात अपघात होऊन दोन्ही युवक महामार्गावर पडल्याचे दिसले. त्याने बस थांबवून दोघांना तत्काळ उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच नागरिकांनी सटाणा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.कुटुंबीयातील कर्ते पुरूषअपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या जयेश व विशाल हे दोघेही युवक सर्वसामान्य कुटुंबातील असून स्वभावाने मनमिळावू होते. ऐन वाढदिवसाच्या दिवशीच जयेशचा अपघाती मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबीयांसह इंगळे कुटुंबीयांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोघांच्या दुर्दैवी अपघाती मृत्युमुळे व घरातील कर्ते असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पुढील तपास करीत आहेत.नियमांची पायमल्लीसाक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील ताहराबाद ते मंगळूर व सोग्रस फाट्यादरम्यान ट्रॅक्टरचालक कोणताही अंदाज न घेता भरधाव वेगाने वाहन चालवत असतात. त्यातच ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच ही वाहने मोठ्या आकाराचे साऊंड लावतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात. यामुळे नियमांची पायमल्ली करून अपघातांना करणीभूत ठरणार्‍या अशा ट्रॅक्टरचालक आणि इतर वाहनांवर पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे यांनी केली आहे.फोटो- २३ जयेश-विशालजयेश नितीन अहीरे व विशाल संजय इंगळे

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू