शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

By अझहर शेख | Updated: July 28, 2019 00:13 IST

‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.

नाशिक : ‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. नैसर्गिक ऋतूचक्रही बिघडत आहे. याची जाणी ठेवत वनांचे महत्त्व जिल्ह्यातील वीस आदिवासी गावांना पटले असून, वनसंवर्धनासाठी त्यांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. हजारो हेक्टरवर रोपवन विकसित करून उत्तमप्रकारे त्याचे संवर्धन लोकसहभागातून होताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध गावे दरवर्षी संत तुकाराम वनग्राम योजनेत बक्षीसपात्र ठरत आहेत.नैसर्गिक राखीव वनक्षेत्र किंवा रोपवनातील वृक्षसंपदा असो, त्यांचे संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे आहे. वने टिकली तर परिसरात पर्जन्यमानाचे प्रमाणही टिकून राहण्यास मदत होते. आदिवासी गावकऱ्यांनाही वनांचे महत्त्व पटले असून, वनविभागाने स्थापन केलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितींच्या माध्यमातून गावकºयांनी एकत्र येत वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखण्यासह वनक्षेत्रात चराई व कुºहाडबंदीचा निर्णय घेतला.वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील ननाशी, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा, उंबरठाण, दिंडोरी या वनपरिक्षेत्रातील सुमारे वीस गावांनी नैसर्गिक जंगलाचे संरक्षण करण्याबरोबरच नव्याने वृक्षलागवडीवरही भर दिला आहे. जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतकºयांना घेणे शक्य होत आहे.जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.वनसंवर्धनाच्या माध्यमातून गाव, पाड्यांचा शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न वनविभाग लोकसहभागातून करत आहे. पूर्व भागातील सुरगाणा ते कळवण वनपरिक्षेत्रातील बहुतांश गावे स्वयंस्फूर्तीने पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा या भागात जंगलांची घनता वाढलेली दिसून येईल. त्याचा फायदा गावकºयांनाही निश्चित स्वरूपात होणार आहे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्वगाव, पाड्यांनी जंगले राखली त्याचा सर्व फायदा शासनआदेशानुसार त्याच गावांना मिळवून देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. निंबारपाड्यावर आदिवासींनी जपलेला बांबू वनविभागाने विक्री करून मिळालेला मोबादला संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी खर्च करण्यावर भर दिला जाणार आहे.- सुजित नेवसे, सहायक वनसंरक्षकगवळीपाड्यात लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून त्याचे जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते गावकºयांनी सांभाळले. त्यामुळे संत तुकाराम वनग्राम योजनेत गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात आहे.- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्चिम भाग, नाशिकअसे केले निसर्गसंवर्धन जंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार दरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धन जंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले. वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली. जंगलात होणारी घुसखोरी थांबविली. चराई व कुºहाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला.या गावांनी घेतली आघाडी पूर्व भाग : सुरगाणा वनपरिक्षेत्र : गोंदुणे, देवगाव, निंबारपाडा, त्रिभुवन. कनाशी वनपरिक्षेत्र : शेपूपाडा, कोसवन. दिंडोरी वनपरिक्षेत्र : भातोडा. कळवण वनपरिक्षेत्र : इन्शी. चांदवड वनपरिक्षेत्र : कानडगाव पश्चिम भाग : ननाशी वनपरिक्षेत्र - गवळीपाडा (महाजे), शृंगारपाडा, चिमणपाडा, झारली, धोंडापाडा त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र : काचुर्ली, श्रीघाट, टाके देवगाव, कळमुस्ते, हर्षेवाडी.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग