शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चित्रपटाचे शूटिंग करता-करता वीस दिवसांत गोगलगाव हगणदारीमुक्त झाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:49 IST

कलावंतांचा सामाजिक पुढाकार : दोन हजार लोकवस्तीच्या गावाची यशोगाथा पडद्यावर

ठळक मुद्देनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगाव या दोन हजार लोकवस्तीच्या गावाची आश्चर्यकथा गोगलगावची हीच यशोगाथा अनासपुरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांपुढे आणली आहे

नाशिक : मकरंद अनासपुरे हा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक. अभिनयाबरोबरच सामाजिक भान असलेल्या या कलावंताने आपल्या चित्रपटाचे शूटिंग करतानाच आख्खं गावच अवघ्या २० दिवसांत हगणदारीमुक्तीसह व्यसनमुक्त करण्याचा पराक्रम केला. नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगाव या दोन हजार लोकवस्तीच्या गावाची हीच आश्चर्यकथा आता ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या पराक्रमाला नाशिकचा उमदा आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सचिन शिंदेसह पल्लवी पटवर्धन, धनंजय वाबळे आणि अजय तारगे या कलावंतांच्या योगदानाचीही झालर लागलेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे गोडवे सारेच गातात, प्रत्यक्षात ही संकल्पना अंमलात आणताना मात्र अनेकांची दमछाक होते. मात्र, गोगलगावात अभिनेता मकरंद अनासपुरे व त्यांच्या सहका-यांनी घडविलेला पराक्रम हा कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय आहे. अनासपुरे हे स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून काम पाहतात. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने डॉक्युमेंटरी करण्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोगलगावची निवड केली. गावात अस्वच्छता पाचवीला पुजलेली, वेड्या बाभळींची संख्या वाढलेली आणि एकही शौचालय नसलेल्या गोगलगावात मकरंद अनासपुरे व दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामस्थांना विश्वासात घेत वीस दिवसांत आख्ख्या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. अनासपुरेंनी स्वत:च्या पदरचे दीड लाख रुपये दिले आणि लोकवर्गणीतून गावात ३०० शौचालयांची उभारणी केली. गावातच असलेल्या साखर कारखान्याकडून कच-यासाठी डस्टबिन मिळविल्या. वेड्या बाभळी तोडून टाकल्या. शाळा इमारतीची रंगरंगोटी केली. पडक्या वाड्यांची डागडुजी करत एका ठिकाणी वाचनालय सुरू केले. एका ठिकाणी ओटा बांधून सभागृहाची निर्मिती केली. गावातच दोन पानटप-या होत्या. त्या हटवताना पानटपरीचालकांचे पुनर्वसन केले. एकाला बियाणांचे, तर दुस-याला स्टेशनरीचे दुकान थाटून दिले. टपरीमुक्त गाव झाल्याने आपोआप गुटखा, सिगारेटचीही विक्री बंद झाली आणि गाव व्यसनमुक्तही होण्यास मदत झाली. शूटिंगदरम्यान अवघ्या वीस दिवसांत हा चमत्कार घडला. पुढे या डॉक्युमेंटरीची मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत सर्वांकडून वाहवा झाली. अभिनेता नाना पाटेकरपासून हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनीही आपला खारीचा वाटा उचलला. हगणदारीमुक्त व व्यसनमुक्त झालेल्या या गावाला शासनाचे ग्रामस्वच्छता पारितोषिकही मिळाले. आता गोगलगावची हीच यशोगाथा अनासपुरे यांनी ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांपुढे आणली आहे. येत्या शुक्रवारी (दि. १५) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.विविध भाषांतही लवकरच प्रदर्शितसुमित पवार निर्मित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ हा चित्रपट आता मराठीत प्रदर्शित होत आहे. परंतु, लवकरच तो भारतातल्या विविध भाषांतही आणण्याचे काम सुरू आहे. या करमणूकप्रधान चित्रपटातून स्वच्छताविषयक मंत्रही आणि संदेशही देण्यात आला आहे. या चित्रपटात अनासपुरे यांच्यासह शशांक शेंडे, प्रवीण तरडे, मानसी आठवले, नाशिकचे धनंजय वाबळे, पल्लवी पटवर्धन आणि अजय तारगे यांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरे