शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

बारावी निकालाचा पेच; अकरावी ‘रेस्ट ईयर’ समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे ...

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. मात्र बारावीचे प्रॅक्टिकल झालेच नाही. बारावीला अंतर्गत गुणही नाहीत. शिवाय अनेक विद्यार्थी अकरावी हे रेस्ट ईयर समजतात. त्यामुळे एकूणच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेची शाश्वती नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने घेणार, हा प्रश्न पालकांना सतावू लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षेबाबत सध्या तरी खरे दिसत नाही. त्यामुळे आता अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. त्यातही प्रॅक्टिलही झाले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कसे द्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. यावरून शिक्षकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. बारावीला अंतर्गत गुण नाहीत. अशा स्थितीत बारावीच्या निकालाबाबत शिक्षण विभागाचे नेमके धोरण काय राहील, हे सध्या तरी स्पष्टपणे सांगत नाही. याकडे प्राचार्यांनी लक्ष वेधले, अकरावीला शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी या बर्षाला 'रेस्ट ईयर' समजतात. त्यामुळे भविष्यातील शिक्षणाचे नुकसान होणार, ही धास्ती विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

गेल्यावर्षी अकरावीच्या परीक्षाच झाल्या नाहीत

कोरोनाच्या धास्तीमुळे शिक्षण विभागाने गतवर्षी अकरावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्वांना १२वीत पदोन्नत करण्यात आले. मात्र, अभ्यासातील अडचणी जैसे थे होत्या. अनेक

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कन्सेप्टच टूर झाला नाही. त्यामुळे ज्ञान व माहितीचा पाया कच्चा राहिला. प्रॅक्टिकलही झाल्या नाहीत. अशा स्थितीत विद्यार्थी पदोन्नत झाले, तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी चिंता

पालकांमध्ये कायम आहे.

बारावीला अंतर्गत गुण कोठे असतात?

बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० गुणांची गणित व इंग्रजी विषयांची तोंडी परीक्षा घेतली जाते. त्याशिवाय २०-२० गुणांची अन्य विषयांचीही चाचणी होते. ही परीक्षा देणाऱ्यांना अंतर्गत गुण मिळतात. कोरोनामुळे वार्षिक व अन्य विषयाच्या तोंडी परीक्षाही घेता आल्या नाहीत. यातून विद्यार्थ्यांची क्षमता चाचणीही करता आली नाही.

पॉइंटर

बारावीतील विद्यार्थी -७५३४३

कला-२९३४७

वाणिज्य-१४९६८

विज्ञान-२८ १८६

---

बारावीसाठी असे होणार गुणदान

बारावीसाठी गुणदान करताना दहावीतील सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ३० टक्के प्रमाणात, अकरावीचे वार्षिक विषयनिहाय गुण ३० टक्के तसेच बारावीतील वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण ४० टक्के असे एकूण १०० टक्के गुणांचे गुणदान केले जाणार आहे.

---

अकरावी तर ‘रेस्ट ईयर’

अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्षे हे रेस्ट ईयर समजून अभ्यासाकडे फारसे लक्ष देत नाहीत. या विद्यार्थ्यांचे लक्ष प्रामुख्याने दहावी व बारावीच्या परीक्षांसोबत जेईई , नीट, सीईटीसारख्या प्रवेशपरीक्षांवर केंद्रित असते. ते अकरावी सहजपणे उत्तीर्ण करतात. परंतु, गुणसंपादनाकडे फारसे लक्ष देत नाही. अशा विद्यार्थ्यांचे यावर्षी तीन वर्षांच्या मूल्यांकनामुळे नुकसान होणार आहे.

दहावीला मेरिट असूनही अकरावीत कमी गुण असल्यास नुकसान

अनेक विद्यार्थ्यांनी दहावीला चांगले गुण मिळतात . परंतु ते अकरावीला थेट बारावीच्या अभ्यासक्रमाची आणि पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अकरावीच्या अभ्यासक्रमावर फारसे लक्ष केंद्रित करीत नाहीत. त्यामुळेे विद्यार्थ्यांना दहावीत चांगले गुण असून अकरावी कमी गुण मिळतात. परंतु, सध्याच्या निकाल पद्धतीत अकरावीचे गुणही गृहीत धरले जाणार असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या गुणवत्तेवर होऊन विद्यार्थ्यांचे अप्रत्यक्ष नुकसान होणार असल्याची मत शहरातील विविध महाविद्यालयांतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.

कोट

विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता

बारावीची परीक्षा व निकालाचा तिढा कायम आहे. कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या माहितीतही तफावत आहे. सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केल्यास प्राचार्यांकडून शिक्षण विभागाचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे यंदा शिक्षणाचे काय होणार, याची चिंता आहे.

- संजय कदम , विद्यार्थी, उपनगर

अकरावी व बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. त्यातही यंदा प्रॅक्टिकल झाले नाही. त्यामुळे गुणदान कसे करणार, याची माहिती अद्याप शाळेकडून मिळाली नाही. याबाबत नोटीस बोर्डवर स्पष्ट माहितीपत्रक लावावे.

- तनुश्री डोंगरे, विद्यार्थिनी, इंदिरानगर