शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

नरेंद्र मोदी यांचा बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:17 IST

राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची तयारी सुरू केली असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : इंधन दरवाढीसाठीच्या बैठकीचा अजेंडा वेगळाच

नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची तयारी सुरू केली असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीच्या नावाखाली बोलविलेल्या बैठकीचा अजेंडा वेगळाच असून, त्याचा मूळ उद्देश कोणता आहे हे आपण दोन दिवसांत जाहीर करू, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर महाराष्टÑातील पदाधिकाºयांची आढावा बैठक नाशिक येथे घेतली. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.संघाचे ज्येष्ठ सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या विधानावर आंबेडकर यांनी सडकून टीका करतानाच भय्याजी जोशी यांचे वक्तव्य म्हणजे संघाची भूमिका असल्याने प्रकाश आंबेडकर यांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट हिटलरच्या पंक्तीत बसविले.भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाºयांनीही हिटलरवर अविश्वास दाखवला होता, असा टोला लगावला. २०१९ मध्ये भाजपा सरकार सत्तेवर येणार नाही. ही संघाचीदेखील खात्री असल्यानेच त्यांनी पंतप्रधानांना बळीचा बकरा बनविण्याची तयारी केल्याचा तर्क त्यांनी मांडला.‘मी टू’ ही मोहीम चांगली; पण..‘मी टू’ ही मोहीम सध्या गाजत असून, त्यावर बोलताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी ‘मी टू’मुळे महिला बोलायला लागल्या ही चांगली गोष्ट आहे. पुरुष प्रधान संस्कृती असताना महिला अत्याचाराबद्दल बोलताय ही चांगली गोष्ट आहे. मात्र काही महिला याचा दुरुपयोेग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कायदा महिलांच्या बाजूने आहे. मात्र नाहक कोणाची कोणीही बदनामी करू नये, असेही ते म्हणाले.मंत्रिमंडळ विस्तार हे गाजरराज्यात होऊ घातलेला मंत्रिमंडळ विस्तार हे गाजर असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. या मंत्रिमंडळात नव्याने एकाचाही समावेश होईल असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.नोटबंदी किंवा सर्जिकल स्ट्राइक हे आम्ही सांगितलेले नाही. ती संघाची भूमिका असावी, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.नोटाबंदीचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला, तर सर्जिकल स्ट्राइकची सत्यता वादग्रस्त ठरल्याने संघाने आपले हात झटकले असावे आणि मोदी यांनाच सर्वस्वी जबाबदार पकडून आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला असे सांगत त्यांनी संघ आणि मोदींवर टीका केली.राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी राज्यातील परिस्थतीच कॉँग्रेसला फायदा घेत नाही असे सांगून कॉँग्रेसदेखील जातीचे सरकार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. सरकारचे शेतकºयांना नाही तर व्यापाºयांना अभय आहे. सरकारच्या मर्जीने शेतकºयांची लूट होत असताना काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकली नाही. मुळातच कॉँग्रेसने शेतकºयांसाठी काहीही केलेले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या वारसांनी कॉँग्रेसला मातीत गाडले, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ