शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

कृत्रिम वणव्यात वृक्षसंपदा होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:37 IST

पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली

नाशिक : पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली. हा वणवा सलग दोन दिवस भडकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोंगराच्या पाठीमागे अगदी वनक्षेत्राला लागून दगडखाणीत भूसुरुंगाचे स्फोट घडविले जात असल्यामुळे त्याच्या ठिणग्या उडून वणवा भडकण्याचे प्रकार याठिकाणी सर्रासपणे घडत आहे. वनविभागाला अद्याप या प्रकरणी एकही संशयित आढळून आला नसून केवळ तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते हे विशेष!बेळगाव ढगा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकाराने वृक्षराजी संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. तीन वर्षांपूर्वी ४० एकर क्षेत्रात संतोषा, भागडी डोंगराच्या पायथ्याशी २७ हजारांहून अधिक रोपांची लागवड लोकसहभागातून करण्यात आली होती. डोंगराच्या एका बाजूला वृक्षराजी वाढवून वनक्षेत्राचे संवर्धन होत असले तरी दुसºया बाजूने सारूळ शिवारात हेच डोंगर दगडखाणीत उत्खनन करून पोखरले जात आहे. विशेष म्हणजे महसूल-वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव ढगा गावातील लोक डोंगराला हिरवाईचा साज चढविण्यासाठी कष्ट उपसत असताना दुसरीकडे या डोंगराची बाजू मात्र पोखरली जात आहे.त्यामुळे वनविभागाने येथील डोंगराचे व त्याभोवती असलेल्या वनक्षेत्राच्या संवर्धनासाठी कठोर पावले उचलून तातडीने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गुरुवारी (दि.३०) महसूल-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौºयावर असून ३३ कोटी वृक्षलागवडीबाबात ते प्रशासकीय बैठक घेणार आहेत.त्यांच्या दौºयाच्या तोंडावर कृत्रिम वणवा लागून दहा ते बारा वर्षांपूर्वीची शेकडो झाडे होरपळली होती. तसेच पक्ष्यांची अंडी या भागात असल्यामुळे त्यांनीही आपली जागा सोडली नाही, परिणामी त्यांनाही जीव गमवावा लागला.जैवविविधतेची अपरिमित हानीपाच ते दहा वर्षांपूर्वी नैसर्गिकरीत्या डोंगरमाथ्यावर वाढलेली तीवस, करंज, साग, कहांडळ, बेडशिंगे, धामोडा, करवंद, शिवण यांसारखी भारतीय प्रजातीची शेकडो झाडे दोन दिवसात कृत्रिम वणव्यात खाक झाली. जैवविविधतेची होणारी अपरिमित हानी भरून न येणारी असून वनविभाग, जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने संयुक्तरीत्या कठोर कारवाई करण्याची मागणी आपलं पर्यावरण संस्था, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, बेळगाव ढगा ग्रामपंचायतीसह नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागFairजत्रा