जंगल संपत्तीचे जतन
By Admin | Updated: August 24, 2014 00:43 IST2014-08-24T00:38:24+5:302014-08-24T00:43:42+5:30
जंगल संपत्तीचे जतन

जंगल संपत्तीचे जतन
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील मोसम खोरे व पश्चिम आदिवासी पट्ट्यातून ऱ्हास होणारी जंगल संपत्तीचे जतन करण्याबरोबर नवीन लागवड करून जंगल संपत्ती वाढविण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे असले तरी त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून विशेष प्रयत्न होत नसल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे.
बागलाण तालुक्यात मोसम परिसरात तसेच पश्चिम पट्ट्यातील डोंगररांगांवर घनदाट जंगले होती. मात्र अलीकडे सध्या या दोन्ही भागात उजाड डोंगर रांगा दिसून येतात. कुठेही घनदाट जंगले तर सोडाच पण मोजता येतील, अशी झाडे सुद्धा दिसत नाहीत. परिणामी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चालला असून, याचे विविध दुष्परिणाम समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे मोसम परिसर व पश्चिम पट्ट्यात वनविभागाच्या वतीने जंगल संपत्तीचे जतन तसेच नवीन वृक्ष लागवड करून वृक्षांची जतन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र या आव्हानाचा वन विभागाच्या प्रशासनाकडून कुठेही स्विकार होत नसल्याचे जाणवते आहे.
आजही अनेक डोंगरावर वृक्षतोड करुन जंगलसंपत्तीची तस्करी होते आहे. याकडे वनविभागाच्या प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार वाढत चालला आहे. तसेच वनजमिनीवरुन मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्तीची तस्करी चालते. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने या भागात पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत चालला आहे. (वार्ताहर)