शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहतुक असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 7:18 PM

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.

ठळक मुद्देमृत्यूचा सापळा : नागरीकांच्या जीवाला निर्माण झाला धोका

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.या धरणाच्या पुलावरु न येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी ये-जा करज असतात. परंतु या धरणावर संरक्षण कठडाच नसल्याने जीव मुठीत धरु न येथुन वावर करावा लागत आहे. शेतकामासाठी लागणारे मजुर तसेच शाळकरी विद्यार्थी याच पुलावरु नियमित ये-जा करत असतात.मागील महिन्यात येथे एक ९ वर्षाचा शाळकरी मुलगा बुडुन मृत्यु पावलेला आहे. सदरचे कुटुंब आदीवासी असल्याने त्यांची दखल कोणत्याही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या बंधाºयावर तात्काळ संरक्षण कठडा बांधण्यात येणे गरजेचे आहे.सद्या पावसाळाचे दिवस असल्याने नदीला पुर आल्यानंतर येथुन ये-जा करणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर संरक्षण कठाडे बसवुनधोका दूर करावा अशी मागणी केली जात आहे.पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथुन ये-जा करणाºया शाळकरी विद्यार्थी, शेतमजुर, रहिवाशी यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे ग्रामस्थ भिती व्यक्त करीत आहेत.पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वाहनधारकांचा ऐन पावसाळ्यात जीव टांगणीला लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाल्यांना पावसानंतर केव्हाही पूर येऊ शकतो. असे असताना कठडे नसलेल्या पुलावरून जाताना विशेषत: पायी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागतो. कहर म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक देखिल लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाटबंधारे विभाग, नांदुरमध्यमेश्वर येथील अधिकारी वर्गास वारंवार याबाबत कळवुनही या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कठड्यअभावी जर एखादी दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. पुढील दिवसांत या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज पुर्ण केले नाही तर आम्ही ग्रामस्थ रस्तयावर उतरु.- विजय गिते, माजी उपसरपंच, खेडला.(फोटो १७ खेडलेझुंगे, १७ खेडलेझुंगे१)