शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

मालेगाव : शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.प्रमुख मार्गांवर बेशिस्त वाहने व हातगाड्या लावण्यासह रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या पथदीपांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणारे अडथळे दूर करण्यात यावे, मोसमपूल ते टेहरे चौफुली तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या मधोमध असलेले पथदीप व रोहित्र, रिक्षा व हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे सदर प्रमुख मार्ग या अतिक्रमणांमुळे अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. मोसमपूल ते टेहरे चौफुली, रावळगाव नाका ते चर्चागेट, सोमवार बाजार, शहरातील सरदार चौक, किदवाईरोड, नवीन बसस्थानक आदी प्रमुख मार्गांवरदेखील अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहने कर्णकर्कश आवाज करतात, त्याचा त्रासदेखील रुग्णांना होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची अशीच अवस्था निर्माण झाली असून, त्याकडे मनपा व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जनतेत असंतोष निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभागांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित दूर करावेत.  मोसमपूल ते टेहरे चौफुली या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते; मात्र रस्त्याच्यामध्ये असलेले पथदीप व ट्रान्सफार्मर, बेशिस्तपणे उभी केली जात असलेली वाहने व हातगाड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. दुपारी व सायंकाळी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अपघाताचे प्रकारदेखील वाढून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे टाळले जाते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस