शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
4
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
5
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
6
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
7
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
8
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
9
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
10
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
11
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
12
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
13
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
14
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
15
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
16
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
18
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
19
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
20
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
Daily Top 2Weekly Top 5

मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

मालेगाव : शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.प्रमुख मार्गांवर बेशिस्त वाहने व हातगाड्या लावण्यासह रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या पथदीपांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणारे अडथळे दूर करण्यात यावे, मोसमपूल ते टेहरे चौफुली तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या मधोमध असलेले पथदीप व रोहित्र, रिक्षा व हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे सदर प्रमुख मार्ग या अतिक्रमणांमुळे अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. मोसमपूल ते टेहरे चौफुली, रावळगाव नाका ते चर्चागेट, सोमवार बाजार, शहरातील सरदार चौक, किदवाईरोड, नवीन बसस्थानक आदी प्रमुख मार्गांवरदेखील अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहने कर्णकर्कश आवाज करतात, त्याचा त्रासदेखील रुग्णांना होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची अशीच अवस्था निर्माण झाली असून, त्याकडे मनपा व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जनतेत असंतोष निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभागांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित दूर करावेत.  मोसमपूल ते टेहरे चौफुली या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते; मात्र रस्त्याच्यामध्ये असलेले पथदीप व ट्रान्सफार्मर, बेशिस्तपणे उभी केली जात असलेली वाहने व हातगाड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. दुपारी व सायंकाळी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अपघाताचे प्रकारदेखील वाढून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे टाळले जाते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस