शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन धोकादायक पुलामुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:18 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या भागात कधी एसटी बस येते तर कधी येत नाही, अशी अवस्था असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.मैलोंमैल पायपीट करावी लागते तर कधी जीव धोक्यात घालून खासगी प्रवासी वाहतुकीने प्रवास करावा लागत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा याबाबत निवेदन देऊनही या पुलाची कुठल्याही प्रकारची दुरु स्ती न झाल्याने नागरिक वैतागले आहेत.ओझरखेड शिवारात कश्यपी व गोदेच्या संगमावर असलेला जुना अरुंद पूल अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण धोकादायक अवस्थेत गेला आहे. एसटी महामंडळाचे बसचालक या पुलावरून बस घेऊन जाण्यास कचरतात. या भागातील गावांकडे जाणारी बस वाहतूक व अन्य दळणवळणाची साधने या इंग्रजकालीन अरुं द पुलामुळे संपूर्ण विस्कळीत झाली आहे. या पुलाचे बांधकाम व्हावे या कामी सार्वजनिक बांधकाम विभागाने कित्येक वेळा सर्व्हे केला मात्र पूल आजही धोकादायक स्थितीत असून शालेय विध्यार्थी, शेतमाल वाहतूक, कामगार, मजूर, गावकरी यांना गंगाम्हाळुंगी, ओझरखेड, शिवणगाव, गणेशगाव, नासलगाव, पिंपळगाव गरु डेश्वर अशा अनेक गावांना जाणारा मार्गच धोकादायक झाला आहे. यामुळे या भागात चालणारी एसटी महामंडळाची बससेवा बंद पडली आहे. याचा विपरीत परिणाम या भागातील दळणवळणावर झाला असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.गंगाम्हाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत असून, आठ ते दहा हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. ओझरखेड ते गंगाम्हाळुंगी रस्ता आजच्या स्थितीत अत्यंत दुरवस्थेत आहे. एकीकडे ओझरखेड शिवारातील अरुं द जुना धोकादायक पूल याकडे सार्वजनिक बांधकाम व आमदार खासदारांनी सातत्याने दुर्लक्ष केले असल्याने या भागातील शेती, शिक्षण व मोलमजुरी करणाऱ्या व्यवस्था अत्यंत अडचणीत आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या मागील बाजूला असलेल्या ओझरखेड, गंगाम्हाळुंगी, राजेवाडी, शिवणगाव, गणेशगाव (ना.), गणेशगाव (त्रं.), पिंपळगाव गरुडेश्वर या भागातील शेतकरी, विद्यार्थी, मजूरवर्ग कामानिमित्त गिरणारे गावात ये-जा करतात. त्यांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या भागात एसटी महामंडळाचे अधिकारी बस सेवा सुरू करीत नाहीत़गिरणारे गावाकडे येणारा मार्गच अरुं द पूल व धोकादायक रस्त्यामुळे अडचणीत आला असून, या भागात चालणारी वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. विद्यार्थी व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मैलोंमैल पायी चालत पंचक्र ोशीतील गावांना यावे लागते. यात वेळेसह मानसिक ताणही सहन करावा लागत आहे. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे़अत्यंत धोकादायक ठरलेल्या या पुलामुळे या भागात बस येत नाही़ दुर्दैवाने एखादी घटना घडली तर एसटी महामंडळावर त्याचे खापर फोडले जाण्याच्या भीतीने बस बंद आहे़ हा पूल फार जुना असून अरुंद आहे. या पुलावरून एकावेळेस एकच वाहन जाते दुसºया वाहनाला जाण्यास जागाच नसते. तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे तुटलेले असल्याने आणि रस्त्यांवर खड्डे असल्याने सर्व प्रकारच्या वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित हा पूल दुरु स्त करण्याची गरज आहे.- बाळासाहेब गभाले,माजी सदस्य, जिल्हा परिषदनाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्याला आजपर्यंत कुठलाही स्थानिक आमदार, खासदार मिळाला नाही. या भागाने नेहमी पूर्व पट्ट्यातील आमदार, खासदार निवडून दिले. यामुळे आमच्या गंगाम्हाळुंगी, ओझखेड भागातील वाहतूक दळणवळण व आमच्या नागरी समस्या कित्येक वर्ष सुटल्या नाही. बस बंद पडल्याने आम्हाला मैलोंमैल पायपीट करावी लागते. शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील पायपीट करावी लागते हे दुर्दैव आहे.- रावजी फसाळे, नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका